सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडी, दोडका, गवारच्या दरात पुन्हा तेजीचे वातावरण राहिले. त्यांची आवक तुलनेने कमीच होती, पण मागणी असल्याने संपूर्ण सप्ताहभर त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडक्याची रोज २० क्विंटल, भेंडीची १५ क्विंटल आणि गवारीची १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत आणि मागणीत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण सर्वाधिक मागणी असल्याने चांगला उठाव मिळतो आहे. गवार, भेंडी, दोडक्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली.
बाहेरील आवक खूपच कमी होती. सध्या पाण्याच्या टंचाईमुळे आवकेवरही बराचसा परिणाम झाला आहे. त्याचाही परिणाम वाढत्या दरावर होतो आहे. दोडक्याला प्रतिक्विंटलला सरासरी किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान ४०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर गवारला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबिरीलाही पुन्हा मागणी राहिली. त्यांचे दरही तेजीतच राहिले. भाज्यांची आवक रोज प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ११०० रुपये, शेपूला ३०० ते ८०० रुपये आणि कोथिंबिरीला २०० ते ७०० रुपये असा आहे.
त्याशिवाय गाजर आणि काकडीलाही काहीसा उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम रोज १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. गाजराला प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर काकडीला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.
कांद्याचे दरही टिकून
बाजार समितीच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून
कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होते आहे. पण मागणी असल्याने कांद्याचे दरही काहीसे टिकून आहेत. कांद्याची रोज २० ते ३० गाड्यापर्यंत आवक आहे. जिल्ह्यासह बाहेरूनही आवक होते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपयांपर्यंत दर आहे. किरकोळ १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडी, दोडका, गवारच्या दरात पुन्हा तेजीचे वातावरण राहिले. त्यांची आवक तुलनेने कमीच होती, पण मागणी असल्याने संपूर्ण सप्ताहभर त्यांच्या दरात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडक्याची रोज २० क्विंटल, भेंडीची १५ क्विंटल आणि गवारीची १० क्विंटल आवक झाली. गेल्या दोन पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत आणि मागणीत सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण सर्वाधिक मागणी असल्याने चांगला उठाव मिळतो आहे. गवार, भेंडी, दोडक्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली.
बाहेरील आवक खूपच कमी होती. सध्या पाण्याच्या टंचाईमुळे आवकेवरही बराचसा परिणाम झाला आहे. त्याचाही परिणाम वाढत्या दरावर होतो आहे. दोडक्याला प्रतिक्विंटलला सरासरी किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान ४०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर गवारला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबिरीलाही पुन्हा मागणी राहिली. त्यांचे दरही तेजीतच राहिले. भाज्यांची आवक रोज प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ११०० रुपये, शेपूला ३०० ते ८०० रुपये आणि कोथिंबिरीला २०० ते ७०० रुपये असा आहे.
त्याशिवाय गाजर आणि काकडीलाही काहीसा उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम रोज १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. गाजराला प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर काकडीला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.
कांद्याचे दरही टिकून
बाजार समितीच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून
कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होते आहे. पण मागणी असल्याने कांद्याचे दरही काहीसे टिकून आहेत. कांद्याची रोज २० ते ३० गाड्यापर्यंत आवक आहे. जिल्ह्यासह बाहेरूनही आवक होते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपयांपर्यंत दर आहे. किरकोळ १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment