Tuesday, October 30, 2018

इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणन

एकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने धावत आहे. त्याला सर्व काही तयार हवं आहे व त्यासाठी तो पैसे मोजायला तयार आहे. त्यात ऑनलाइन मार्केटमध्ये ब-याच कंपन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे व इतर गृहोपयोगी वस्तू आकर्षक पॅकेजिंगमध्ये घरपोच करतात; त्यामुळे शेतक-यांच्या मालालाही यामध्ये मोठा वाव आहे.

शेतमालाची 'कॅश ऑन डिलिव्हरी
वस्तू मिळाल्यावर पैशाच्या स्वरूपात तिची किंमत मोजतो, याच संकल्पनेला 'कॅश ऑन डिलिव्हरी' म्हणतात. या संकल्पनेवर आधारित शेतकरी आपला भाजीपाला विकू शकतो. त्यासाठी भविष्यातील आव्हाने ओळखून शेतक-यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरण्याची व शेतमालाचे प्रक्रियेतून मूल्यवर्धन करण्याची गरज आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपेक्षित दर मिळविणे व शेतमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल.

थेट भाजीपाला विक्री शक्य
योग्य बाजारपेठेअभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे शेतमालाचे, विशेषतः भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भाजीपाला निर्जलीकरण हा यावर एक उत्तम पर्याय आहे. मात्र, या संकल्पनेतून शेतकरी आपला सर्व शेतमाल विकू शकतो. बाजार समितीतील लिलाव पद्धती, मध्यस्थांचे कमिशन व उचांकी आवक यामुळे शेतमालाचे दर पडतात. या सर्व अडचणींवर 'थेट घरपोच भाजीपाला पुरवठा' ही संकल्पना काहीशा प्रमाणात नियंत्रण आणू शकते. यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.

  • अत्याधुनिक लागवड ते कृषिमाल विपणन
  • उत्तम दर्जाचे कृषिमाल उत्पादन
  • ग्राहक वर्गाच्या पसंतीचा अभ्यास
  • कीटकनाशकांचा कमीत कमी वापर
  • सेंद्रिय शेतीचा अवलंब
  • दर्जात्मक मालाची निवड
  • आकर्षक पॅकेजिंग
  • दैनंदिन व वेळेत भाजीपालापुरवठा

साप्ताहिक अथवा मासिक ग्राहक अभिप्राय व मोबाईल, सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रभावी वापर

  • भाजीपाल्याच्या मार्केटिंगसाठी पुणे-मुंबई यासारखी मोठी शहरे शेतकरीवर्गाला खुणावत आहेत. ही मोठी संधी ओळखून यात उतरले पाहिजे.
  • 'नंबर फिरवा आणि भाजी मिळवा' हा उपक्रमसुद्धा राबवू शकतो. यात शेतकरी भाजीपाला, तसेच इतरही कृषिमाल उदा. धान्य, डाळी, फळे व इतर कृषिमाल विकून चांगले अर्थार्जन करू शकतो.
  • काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिक्षेत्रात ब-याच प्रमाणात नुकसान होताना दिसते. या समस्येवर कृषिमाल प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे.
  • इस्राईल अाणि स्वित्झर्लंडमध्ये ५० टक्के शेतमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतमालाची मुबलक उपलब्धता आहे; मात्र योग्य व्यवस्थापन काौशल्याआभावी प्रक्रिया होत नाही.
  • योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड़ दिली, तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल, तर शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे .

संपर्क ः गणेश शिंदे, ८३२९१२८४०४
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

News Item ID: 
18-news_story-1540902686
Mobile Device Headline: 
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणन
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

एकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने धावत आहे. त्याला सर्व काही तयार हवं आहे व त्यासाठी तो पैसे मोजायला तयार आहे. त्यात ऑनलाइन मार्केटमध्ये ब-याच कंपन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे व इतर गृहोपयोगी वस्तू आकर्षक पॅकेजिंगमध्ये घरपोच करतात; त्यामुळे शेतक-यांच्या मालालाही यामध्ये मोठा वाव आहे.

शेतमालाची 'कॅश ऑन डिलिव्हरी
वस्तू मिळाल्यावर पैशाच्या स्वरूपात तिची किंमत मोजतो, याच संकल्पनेला 'कॅश ऑन डिलिव्हरी' म्हणतात. या संकल्पनेवर आधारित शेतकरी आपला भाजीपाला विकू शकतो. त्यासाठी भविष्यातील आव्हाने ओळखून शेतक-यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरण्याची व शेतमालाचे प्रक्रियेतून मूल्यवर्धन करण्याची गरज आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपेक्षित दर मिळविणे व शेतमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल.

थेट भाजीपाला विक्री शक्य
योग्य बाजारपेठेअभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे शेतमालाचे, विशेषतः भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भाजीपाला निर्जलीकरण हा यावर एक उत्तम पर्याय आहे. मात्र, या संकल्पनेतून शेतकरी आपला सर्व शेतमाल विकू शकतो. बाजार समितीतील लिलाव पद्धती, मध्यस्थांचे कमिशन व उचांकी आवक यामुळे शेतमालाचे दर पडतात. या सर्व अडचणींवर 'थेट घरपोच भाजीपाला पुरवठा' ही संकल्पना काहीशा प्रमाणात नियंत्रण आणू शकते. यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.

  • अत्याधुनिक लागवड ते कृषिमाल विपणन
  • उत्तम दर्जाचे कृषिमाल उत्पादन
  • ग्राहक वर्गाच्या पसंतीचा अभ्यास
  • कीटकनाशकांचा कमीत कमी वापर
  • सेंद्रिय शेतीचा अवलंब
  • दर्जात्मक मालाची निवड
  • आकर्षक पॅकेजिंग
  • दैनंदिन व वेळेत भाजीपालापुरवठा

साप्ताहिक अथवा मासिक ग्राहक अभिप्राय व मोबाईल, सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रभावी वापर

  • भाजीपाल्याच्या मार्केटिंगसाठी पुणे-मुंबई यासारखी मोठी शहरे शेतकरीवर्गाला खुणावत आहेत. ही मोठी संधी ओळखून यात उतरले पाहिजे.
  • 'नंबर फिरवा आणि भाजी मिळवा' हा उपक्रमसुद्धा राबवू शकतो. यात शेतकरी भाजीपाला, तसेच इतरही कृषिमाल उदा. धान्य, डाळी, फळे व इतर कृषिमाल विकून चांगले अर्थार्जन करू शकतो.
  • काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिक्षेत्रात ब-याच प्रमाणात नुकसान होताना दिसते. या समस्येवर कृषिमाल प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे.
  • इस्राईल अाणि स्वित्झर्लंडमध्ये ५० टक्के शेतमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतमालाची मुबलक उपलब्धता आहे; मात्र योग्य व्यवस्थापन काौशल्याआभावी प्रक्रिया होत नाही.
  • योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड़ दिली, तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल, तर शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे .

संपर्क ः गणेश शिंदे, ८३२९१२८४०४
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

English Headline: 
agriculture story in marathi, advantages of online marketing of agril. commodities
Author Type: 
External Author
गणेश शिंदे, शिवप्रिया केन्चे
Twitter Publish: 


0 comments:

Post a Comment