पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) आणि सोमवारी (ता. २९) बाजार आवारात लिलावामध्ये ज्वारीला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी (ता. २५) क्विंटलला कमाल ४०१५ रुपये, किमान २ हजार ५०० रुपये एवढा, तर सरासरी तीन हजार ५०० रुपये एवढा दर मिळाला आहे. बाजार आवारात एकूण ५०६ क्विटंलची आवक झाली होती.
सोमवारी (ता. २९) ३४५ क्विंटलची आवक झाली होती. हा दर शेतकरी हनुमंत चांगण, गणेश चांगण, मधुकर सोलवणकर, गजानन चांगण, श्री. नाळे, श्री. महाडिक यांनी आणलेल्या ज्वारीस मिळाला आहे. बारामतीतील बाजार समितीत तालुक्यासह, दहीवडी, माण, पुसेगाव, इंदापूर, दौंड, फलटण, दुधवाबी, राशीन या भागातील शेतकरी ज्वारी आणून विकत असतात. सध्या पूर्व पट्ट्यातील अनेक भागात पाणीटंचाई भासत आहे. खरिपातही कमी पावसामुळे पिके वाया गेली आहेत.
शेतकरी स्वतःकडील असलेल्या शेतीमाल बाजारात विक्रीस तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार आवारात कमी आवक असल्याने शेतीमालाचे दर मागणी व पुरवठा यानुसार मिळत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. मार्केटमध्ये बाळासाहेबर फराटे, अमोल वाडीकर, शिवाजी फाळके, केशव मचाले, वैभव शिंदे असे आडतदार असून, बाळासाहेब फराटे यांच्याकडे सर्वाधिक दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
‘सध्या पाणीटंचाई सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी पेरणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात कमी माल विक्रीसाठी आणत आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी जादा दर मिळेल.’
अनिल हिवरकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती
पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) आणि सोमवारी (ता. २९) बाजार आवारात लिलावामध्ये ज्वारीला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी (ता. २५) क्विंटलला कमाल ४०१५ रुपये, किमान २ हजार ५०० रुपये एवढा, तर सरासरी तीन हजार ५०० रुपये एवढा दर मिळाला आहे. बाजार आवारात एकूण ५०६ क्विटंलची आवक झाली होती.
सोमवारी (ता. २९) ३४५ क्विंटलची आवक झाली होती. हा दर शेतकरी हनुमंत चांगण, गणेश चांगण, मधुकर सोलवणकर, गजानन चांगण, श्री. नाळे, श्री. महाडिक यांनी आणलेल्या ज्वारीस मिळाला आहे. बारामतीतील बाजार समितीत तालुक्यासह, दहीवडी, माण, पुसेगाव, इंदापूर, दौंड, फलटण, दुधवाबी, राशीन या भागातील शेतकरी ज्वारी आणून विकत असतात. सध्या पूर्व पट्ट्यातील अनेक भागात पाणीटंचाई भासत आहे. खरिपातही कमी पावसामुळे पिके वाया गेली आहेत.
शेतकरी स्वतःकडील असलेल्या शेतीमाल बाजारात विक्रीस तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार आवारात कमी आवक असल्याने शेतीमालाचे दर मागणी व पुरवठा यानुसार मिळत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. मार्केटमध्ये बाळासाहेबर फराटे, अमोल वाडीकर, शिवाजी फाळके, केशव मचाले, वैभव शिंदे असे आडतदार असून, बाळासाहेब फराटे यांच्याकडे सर्वाधिक दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
‘सध्या पाणीटंचाई सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी पेरणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात कमी माल विक्रीसाठी आणत आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी जादा दर मिळेल.’
अनिल हिवरकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती
No comments:
Post a Comment