Pages - Menu

Thursday, November 1, 2018

खानदेशातील सोयाबीन आवक घटली

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर मागील आठ ते १० दिवसांपासून ३१०० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. आवक दिवसागणिक कमी होत आहे. त्यातच पुढे सणासुदीनिमित्त बाजार बंद अवस्थेत राहील. यामुळे सध्या व्यवहार पूर्ण करण्याची लगबग बाजार समित्यांमध्ये आहे.

खानदेशात शहादा (जि. नंदुरबार), जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव व पाचोरा आणि धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. मागील आठवडाभरापासून आवक कमी झाली आहे. सध्या सर्वाधिक २०० क्विंटल प्रतिदिन आवक चोपडा बाजार समितीत होत आहे.

जळगाव, पाचोरा येथील बाजारात प्रतिदिन १५० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. शहादा, तळोदा तालुक्‍यात सोयाबीनची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. या भागात उत्पादन एकरी तीन क्विंटलपर्यंत आले आहे. शहादा बाजारातील आवक प्रतिदिन २००क्विंटलपर्यंत आहे. मागील महिन्याच्या मध्यापूर्वी २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. त्यानंतर मागील आठ ते १० दिवसांपासून कमाल दर ३१५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

सोयाबीनला ३३९९ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव आहे. पण सध्या हमीभावात सोयाबीन खरेदी शासनाने सुरू केली नसल्याने बाजारात शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर, पारोळा, धरणगाव येथील बाजारात सोयाबीनची आवक फारशी नाही. मुक्ताईनगर व रावेरात काही प्रमाणात आवक होत आहे. तेथे लिलावही लागलीच होत असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीची पैशांची अडचण दूर करणे शक्‍य होत आहे.

येत्या रविवारी (ता. ४) वसुबारस असून, प्रकाशपर्व सुरू होईल. त्यानंतर सोमवारी (ता. ५) धनत्रयोदशी व नंतर मंगळवारी (ता. ६) नरकचतुर्दशी आहे. यानंतर लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सण आहे. यादरम्यान बाजार समितीमधील व्यवहार जवळपास ठप्प राहतील. आवक आणखी कमी होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

News Item ID: 
18-news_story-1541078287
Mobile Device Headline: 
खानदेशातील सोयाबीन आवक घटली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर मागील आठ ते १० दिवसांपासून ३१०० ते ३१५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. आवक दिवसागणिक कमी होत आहे. त्यातच पुढे सणासुदीनिमित्त बाजार बंद अवस्थेत राहील. यामुळे सध्या व्यवहार पूर्ण करण्याची लगबग बाजार समित्यांमध्ये आहे.

खानदेशात शहादा (जि. नंदुरबार), जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव व पाचोरा आणि धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. मागील आठवडाभरापासून आवक कमी झाली आहे. सध्या सर्वाधिक २०० क्विंटल प्रतिदिन आवक चोपडा बाजार समितीत होत आहे.

जळगाव, पाचोरा येथील बाजारात प्रतिदिन १५० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. शहादा, तळोदा तालुक्‍यात सोयाबीनची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. या भागात उत्पादन एकरी तीन क्विंटलपर्यंत आले आहे. शहादा बाजारातील आवक प्रतिदिन २००क्विंटलपर्यंत आहे. मागील महिन्याच्या मध्यापूर्वी २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. त्यानंतर मागील आठ ते १० दिवसांपासून कमाल दर ३१५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

सोयाबीनला ३३९९ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव आहे. पण सध्या हमीभावात सोयाबीन खरेदी शासनाने सुरू केली नसल्याने बाजारात शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर, पारोळा, धरणगाव येथील बाजारात सोयाबीनची आवक फारशी नाही. मुक्ताईनगर व रावेरात काही प्रमाणात आवक होत आहे. तेथे लिलावही लागलीच होत असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीची पैशांची अडचण दूर करणे शक्‍य होत आहे.

येत्या रविवारी (ता. ४) वसुबारस असून, प्रकाशपर्व सुरू होईल. त्यानंतर सोमवारी (ता. ५) धनत्रयोदशी व नंतर मंगळवारी (ता. ६) नरकचतुर्दशी आहे. यानंतर लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सण आहे. यादरम्यान बाजार समितीमधील व्यवहार जवळपास ठप्प राहतील. आवक आणखी कमी होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

English Headline: 
agriculture news in marathi, Khandesh soybean in arrivals decreased
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, सोयाबीन, बाजार समिती, agriculture Market Committee, हमीभाव, Minimum Support Price, भुसावळ, वसुबारस
Twitter Publish: 


No comments:

Post a Comment