जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली असून, दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. सध्या केळीची दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मिर येथे पाठवणूक सुरू आहे.
रावेर, मुक्ताईनगर, यावल भागातून सध्या रोज २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मिर येथे ट्रकद्वारे होत आहे. केळीचे दर मागील आठवड्यात १५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु येत्या २५ तारखेपासून रमजान मासारंभ होत असल्याने उत्तरेकडून केळीची मोठी मागणी सुरू झाली आहे.
परिणामी दरात सुधारणा झाली असून, ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर शिवार खरेदीत मिळत आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथूनही मागणी सुरू झाली आहे. उत्तरेकडील खरेदीदार केळीची सावदा (ता.रावेर), फैजपूर (ता. यावल), बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील एजंट, मध्यस्थांकडून केळीची खरेदी करून घेत आहेत. ट्रकद्वारे वाहतूक बऱ्यापैकी सुकर झाली असून, वाहतूक भाडेही पूर्वीप्रमाणे म्हणजेच ५० हजार ते ६५ हजार रुपयांपर्यंत लागत आहे. मध्यंतरी एक लाख रुपयांवर वाहतूक भाडे लागत होते.
आंध्र प्रदेशातील केळी संपल्याचा लाभ
आंध्र प्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळीची पाठवणूकही उत्तर भारतात अधिकची होत असते. आंध्र प्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या रावेर, मुक्ताईनगर भागात दर्जेदार केळी उपलब्ध होत आहे, अशी माहिती केळीचे खरेदीदार वैभव महाजन (सावदा, ता.रावेर) यांनी दिली.
जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली असून, दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. सध्या केळीची दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मिर येथे पाठवणूक सुरू आहे.
रावेर, मुक्ताईनगर, यावल भागातून सध्या रोज २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मिर येथे ट्रकद्वारे होत आहे. केळीचे दर मागील आठवड्यात १५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु येत्या २५ तारखेपासून रमजान मासारंभ होत असल्याने उत्तरेकडून केळीची मोठी मागणी सुरू झाली आहे.
परिणामी दरात सुधारणा झाली असून, ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर शिवार खरेदीत मिळत आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथूनही मागणी सुरू झाली आहे. उत्तरेकडील खरेदीदार केळीची सावदा (ता.रावेर), फैजपूर (ता. यावल), बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील एजंट, मध्यस्थांकडून केळीची खरेदी करून घेत आहेत. ट्रकद्वारे वाहतूक बऱ्यापैकी सुकर झाली असून, वाहतूक भाडेही पूर्वीप्रमाणे म्हणजेच ५० हजार ते ६५ हजार रुपयांपर्यंत लागत आहे. मध्यंतरी एक लाख रुपयांवर वाहतूक भाडे लागत होते.
आंध्र प्रदेशातील केळी संपल्याचा लाभ
आंध्र प्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळीची पाठवणूकही उत्तर भारतात अधिकची होत असते. आंध्र प्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या रावेर, मुक्ताईनगर भागात दर्जेदार केळी उपलब्ध होत आहे, अशी माहिती केळीचे खरेदीदार वैभव महाजन (सावदा, ता.रावेर) यांनी दिली.
No comments:
Post a Comment