आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. पुन्हा शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही. गेम इज ओव्हर. ही ह्रदय पिळवटून टाकणारी वाक्य आहेत सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याची. पंढपुरच्या मगरवाडी येथील सुरूज जाधव या तरूण शेतकऱ्यांनं व्हिडीओ शुट करत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा हा बळी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना डिझेलसाठी देणार अनुदान
राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज पुरवठा तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. महावितरणच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आधिच संतापाची लाट उसळली आहे. त्यातच ऐन रब्बी हंगाम भरात असताना शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज दिली जात आहे. त्यामुळे शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. काही दिवसांत रब्बीचं पीक काढणीला येणार आहे आणि अशातच जर सरकार वीज पुरवठा खंडीत करत असेल, तर त्या शेतकऱ्याच्या हाती पीक लागेल का?, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
हेही वाचा - तेलंगणातील शेतकऱ्यांचा भात पिकाकडे ओढा कायम
गेल्या दहा बारा वर्षात शेती करण म्हणजे आतबट्याचा धंदा झाला आहे. यावर श्रेणीक नरदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी शेतीचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचं गणित मांडलं आहे.
गेल्या काही वर्षात १०-१५ दिवस वगळता संपूर्ण वर्षभर शेतमालाचे दर कायम कोसळलेलेच असतात. याच १०-१५ दिवसात कोण एखादा शेतकरी शेतमालाल चांगला दर मिळाला म्हणून लखपती होतो. अशा शेतकऱ्यांच्या बातम्याच्या बातम्या छापून येतात. तुम्ही आजही बाजारात भाजी आणायला गेलात तरी पाच नाहीतर दहा रुपयांना भाजीची पेंडी मिळते, जी दहा वर्षांपूर्वीही तेवढ्यालाच मिळायची.
पण शेतीचा उत्पादन खर्च मोक्कार वाढला आहे. मशागत म्हणू नका, मजूर म्हणू नका खते, औषधं बी-बियाणं, वाहतूक, पाईपलाईन, वीजबीलं काय काय आणि किती किती खर्च वाढला आहे. हा खर्च नुसताच वाढला नाही तर कित्येत पटीनं वाढला आहे. पण शेतमालाचे भाव दहावर्षांपूर्वी होते तितकेच राहिले आहेत.
सरकारी असो नाहीतर खासगी. नोकरदारांचा पगार लाखात गेलाय. म्हणून त्याने कधी ५० रुपयांने घेतलीय असं दिसत नाही. आणि त्याने तरी का घ्यावी महाग कोथंबीर. शेवटी हे मार्केट आहे. आवक वाढली की मालाचे दर पडणारच.. इतकं साधं गणित आहे.
शेती परवडत नाही म्हणून शेतकरी जोडधंद्याच्या नादी लागतो. तिथं पण त्याची तीच दैना. दुधासाठी जनावरं घ्यावी तर फिल्टर पाण्याच्या बाटलीची जेवढी किंमतय त्यापेक्षीही कमी दर एक लिटर दुधाला शेतकऱ्याला मिळतो. जनावरांचा चारा, औषधंपाणी हा खर्च पण सध्या परवडणारा नाही. मापात घट होईल म्हणून शेतकरी घरच्या लेकराला पण दूध पाजायला कचरतो.
शेतकऱ्याला कुठ टॅक्स असतो. त्याला कर्जमाफी पण शहरात राहणाऱ्या लोकांच्या करातून मिळते. असंही म्हटलं जातं. एका रात्रीत काही सुधारणा होत नाहीत. आता पेट्रोल डिझेल महागल्यानंतर शेतमाल वाहतुकीचा खर्च किमान दीडपट झालायं. काही ठिकाणी तर हाच खर्च दुप्पट झालायं. पण ते अडते व्यापारी किंवा थेट ग्राहकांना शेतकऱ्यांचा हिशोब लक्षातच येत नाही.
एकुणात काय तर शेतीधंदा जुगारापेक्षाही वाईट झालाय. मटक्यात किंवा सट्ट्यात कधीतरी तुक्का लागण्याची आशा असते. तशी आशाही शेतकऱ्यांत राहीली नाही. त्याच्यात फक्त निराशा दाटून राहिलीय. ही निराशा त्याला दोरी घेऊन झाडाकडे तर नेते नाहीकर किंवा औषधाच्या बाटलीचं बूच उघडायला तरी लावते. आज ज्या शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय त्यानं शेवटचं वाक्य डेंजर बोल्लंय. परत शेतकऱ्याचा जन्म नको Game Is Over !
आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. पुन्हा शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही. गेम इज ओव्हर. ही ह्रदय पिळवटून टाकणारी वाक्य आहेत सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याची. पंढपुरच्या मगरवाडी येथील सुरूज जाधव या तरूण शेतकऱ्यांनं व्हिडीओ शुट करत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा हा बळी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना डिझेलसाठी देणार अनुदान
राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज पुरवठा तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. महावितरणच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आधिच संतापाची लाट उसळली आहे. त्यातच ऐन रब्बी हंगाम भरात असताना शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज दिली जात आहे. त्यामुळे शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, अशी मागणीही शेतकरी करत आहेत. काही दिवसांत रब्बीचं पीक काढणीला येणार आहे आणि अशातच जर सरकार वीज पुरवठा खंडीत करत असेल, तर त्या शेतकऱ्याच्या हाती पीक लागेल का?, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
हेही वाचा - तेलंगणातील शेतकऱ्यांचा भात पिकाकडे ओढा कायम
गेल्या दहा बारा वर्षात शेती करण म्हणजे आतबट्याचा धंदा झाला आहे. यावर श्रेणीक नरदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी शेतीचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचं गणित मांडलं आहे.
गेल्या काही वर्षात १०-१५ दिवस वगळता संपूर्ण वर्षभर शेतमालाचे दर कायम कोसळलेलेच असतात. याच १०-१५ दिवसात कोण एखादा शेतकरी शेतमालाल चांगला दर मिळाला म्हणून लखपती होतो. अशा शेतकऱ्यांच्या बातम्याच्या बातम्या छापून येतात. तुम्ही आजही बाजारात भाजी आणायला गेलात तरी पाच नाहीतर दहा रुपयांना भाजीची पेंडी मिळते, जी दहा वर्षांपूर्वीही तेवढ्यालाच मिळायची.
पण शेतीचा उत्पादन खर्च मोक्कार वाढला आहे. मशागत म्हणू नका, मजूर म्हणू नका खते, औषधं बी-बियाणं, वाहतूक, पाईपलाईन, वीजबीलं काय काय आणि किती किती खर्च वाढला आहे. हा खर्च नुसताच वाढला नाही तर कित्येत पटीनं वाढला आहे. पण शेतमालाचे भाव दहावर्षांपूर्वी होते तितकेच राहिले आहेत.
सरकारी असो नाहीतर खासगी. नोकरदारांचा पगार लाखात गेलाय. म्हणून त्याने कधी ५० रुपयांने घेतलीय असं दिसत नाही. आणि त्याने तरी का घ्यावी महाग कोथंबीर. शेवटी हे मार्केट आहे. आवक वाढली की मालाचे दर पडणारच.. इतकं साधं गणित आहे.
शेती परवडत नाही म्हणून शेतकरी जोडधंद्याच्या नादी लागतो. तिथं पण त्याची तीच दैना. दुधासाठी जनावरं घ्यावी तर फिल्टर पाण्याच्या बाटलीची जेवढी किंमतय त्यापेक्षीही कमी दर एक लिटर दुधाला शेतकऱ्याला मिळतो. जनावरांचा चारा, औषधंपाणी हा खर्च पण सध्या परवडणारा नाही. मापात घट होईल म्हणून शेतकरी घरच्या लेकराला पण दूध पाजायला कचरतो.
शेतकऱ्याला कुठ टॅक्स असतो. त्याला कर्जमाफी पण शहरात राहणाऱ्या लोकांच्या करातून मिळते. असंही म्हटलं जातं. एका रात्रीत काही सुधारणा होत नाहीत. आता पेट्रोल डिझेल महागल्यानंतर शेतमाल वाहतुकीचा खर्च किमान दीडपट झालायं. काही ठिकाणी तर हाच खर्च दुप्पट झालायं. पण ते अडते व्यापारी किंवा थेट ग्राहकांना शेतकऱ्यांचा हिशोब लक्षातच येत नाही.
एकुणात काय तर शेतीधंदा जुगारापेक्षाही वाईट झालाय. मटक्यात किंवा सट्ट्यात कधीतरी तुक्का लागण्याची आशा असते. तशी आशाही शेतकऱ्यांत राहीली नाही. त्याच्यात फक्त निराशा दाटून राहिलीय. ही निराशा त्याला दोरी घेऊन झाडाकडे तर नेते नाहीकर किंवा औषधाच्या बाटलीचं बूच उघडायला तरी लावते. आज ज्या शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय त्यानं शेवटचं वाक्य डेंजर बोल्लंय. परत शेतकऱ्याचा जन्म नको Game Is Over !
No comments:
Post a Comment