1. कालप्रमाणेच आजही सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भाचं कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं जास्त होतं. तर मराठवाड्यातल्या किमान तापमानाचीही हीच अवस्था होती. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढाच राहीला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही तापमापकांनी पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानाची नोंद केली आहे. येते पाच दिवस या परिस्थितीत कोणताही मोठा बदल होणार नाही, असं हवामानशास्त्र विभागाच्या माहितीवरून दिसतंय.
Daily Weather Video (Hindi) Dated 01.03.2022
You Tube Link: https://t.co/VDjGOvYPt3
Facebook Link: https://t.co/UgljTglYSZ— India Meteorological Department (@Indiametdept) March 1, 2022
2. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी ३३ जिल्ह्यांसाठी हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलीये. कृषी विभागाच्या द्वितीय आगाऊ अंदाजानुसार ही उत्पादकता जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी करावी, असे निर्देश सहकार, पणन, आणि वस्त्रोउद्योग विभागातर्फे देण्यात आलेत. चालू हंगामात राज्यात हरभऱ्याची हमीभावानं खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला १७ फेब्रुवारीला मंजुरी मिळालीये. त्यानुसार ६.८९ लाख टन हरभरा खरेदीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय.
हे देखील वाचा : माधबी पुरी बुच सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष
3. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना जास्तीत जास्त साखर विक्री करता यावी, यासाठी केंद्रानं मार्च महिन्याचा कोटा दीड लाख टनानं वाढवून दिलाय. देशातील ५६६ साखर कारखान्यांना २१.५० लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. फेब्रुवारीत वीस लाख टन कोटा केंद्राच्या वतीने देण्यात आला होता. ओमिक्रॉनचे सावट दूर होत असताना उन्हाळ्याची तीव्रता देशात हळूहळू वाढू लागली आहे. बाजारपेठा खुल्या झाल्याने येत्या महिन्याभरात कोल्ड्रींक्स आणि आईसक्रीम उद्योगांकडून साखरेला मागणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक समारंभही हळूहळू सुरू होत असल्याने साखर विक्री वाढेल असा अंदाज आहे. हेच लक्षात घेऊन केंद्राने मार्च साठी दीड लाख टनाचा अतिरिक्त कोटा दिला आहे.
हे देखील वाचा : तिसऱ्या तिमाहीत GDP ची गाडी ५.४ टक्क्यांवर अडकली
4. रशिया आणि युक्रेनमधून जगाला गहू, मका आणि सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठा होतो. युद्धामुळे आधीच शेतीमालासह अनेक वस्तूंचे दर वाढले. युद्ध आणखी काही दिवस चालल्यास जगात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. रशिया आणि युक्रेनचा गहू आणि मक्यासह सूर्यफूल पुरवठ्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे या शेतमालाच्या दरांसह महागाईही वाढण्याची शक्यता आहे.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. केंद्र सरकारने चालू विपणन हंगामात किमान आधारभूत किमतीने ७०७.२४ लाख टन भाताची खरेदी केली आहे. या सरकारी खरेदीचा ९६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला असून खरेदीपोटी सरकारने एक लाख ३८ हजार ६१९ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी (ता.२८) एका निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात म्हटल्यानुसार, चालू विपणन हंगामात २७ फेब्रुवारीपर्यंत ७०७.२४ लाख टन भाताची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या खरेदीपैकी सर्वाधिक १८६.८५ लाख टन भाताची खरेदी पंजाब राज्यातून करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ छत्तीसगडमधून ९२.०१ लाख टन, तेलंगाणातून ७०.२२ लाख टन हरियाणातून ५५.३० लाख टन आणि ६४.९३ लाख टन भाताची खरेदी ही उत्तर प्रदेशमधून करण्यात आली आहे. मागील विपणन हंगामात (२०२०-२१) सरकारने किमान आधारभूत किमतीने ८९५.८३ लाख टन भाताची खरेदी केली होती. ज्याचे मूल्य एक लाख ६९ हजार १३३ कोटी रुपये इतके होते. देशात भात खरेदी विपणन हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत चालतो. भारतीय अन्न महामंडळ तसेच राज्य सरकारच्या इतर खरेदी एजन्सीच्या मार्फतकेंद्र सरकार खेरदीची प्रक्रिया राबवते. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचे संरक्षण सरकार गहू आणि तांदळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. सरकार खरेदी केलेले धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना शिधावाटप दुकानातून अनुदानित दराने वितरणासाठी वापरते.
1. कालप्रमाणेच आजही सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भाचं कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं जास्त होतं. तर मराठवाड्यातल्या किमान तापमानाचीही हीच अवस्था होती. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढाच राहीला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही तापमापकांनी पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानाची नोंद केली आहे. येते पाच दिवस या परिस्थितीत कोणताही मोठा बदल होणार नाही, असं हवामानशास्त्र विभागाच्या माहितीवरून दिसतंय.
Daily Weather Video (Hindi) Dated 01.03.2022
You Tube Link: https://t.co/VDjGOvYPt3
Facebook Link: https://t.co/UgljTglYSZ— India Meteorological Department (@Indiametdept) March 1, 2022
2. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी ३३ जिल्ह्यांसाठी हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलीये. कृषी विभागाच्या द्वितीय आगाऊ अंदाजानुसार ही उत्पादकता जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी करावी, असे निर्देश सहकार, पणन, आणि वस्त्रोउद्योग विभागातर्फे देण्यात आलेत. चालू हंगामात राज्यात हरभऱ्याची हमीभावानं खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला १७ फेब्रुवारीला मंजुरी मिळालीये. त्यानुसार ६.८९ लाख टन हरभरा खरेदीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय.
हे देखील वाचा : माधबी पुरी बुच सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष
3. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांना जास्तीत जास्त साखर विक्री करता यावी, यासाठी केंद्रानं मार्च महिन्याचा कोटा दीड लाख टनानं वाढवून दिलाय. देशातील ५६६ साखर कारखान्यांना २१.५० लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. फेब्रुवारीत वीस लाख टन कोटा केंद्राच्या वतीने देण्यात आला होता. ओमिक्रॉनचे सावट दूर होत असताना उन्हाळ्याची तीव्रता देशात हळूहळू वाढू लागली आहे. बाजारपेठा खुल्या झाल्याने येत्या महिन्याभरात कोल्ड्रींक्स आणि आईसक्रीम उद्योगांकडून साखरेला मागणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक समारंभही हळूहळू सुरू होत असल्याने साखर विक्री वाढेल असा अंदाज आहे. हेच लक्षात घेऊन केंद्राने मार्च साठी दीड लाख टनाचा अतिरिक्त कोटा दिला आहे.
हे देखील वाचा : तिसऱ्या तिमाहीत GDP ची गाडी ५.४ टक्क्यांवर अडकली
4. रशिया आणि युक्रेनमधून जगाला गहू, मका आणि सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठा होतो. युद्धामुळे आधीच शेतीमालासह अनेक वस्तूंचे दर वाढले. युद्ध आणखी काही दिवस चालल्यास जगात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. रशिया आणि युक्रेनचा गहू आणि मक्यासह सूर्यफूल पुरवठ्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे या शेतमालाच्या दरांसह महागाईही वाढण्याची शक्यता आहे.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. केंद्र सरकारने चालू विपणन हंगामात किमान आधारभूत किमतीने ७०७.२४ लाख टन भाताची खरेदी केली आहे. या सरकारी खरेदीचा ९६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला असून खरेदीपोटी सरकारने एक लाख ३८ हजार ६१९ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी (ता.२८) एका निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात म्हटल्यानुसार, चालू विपणन हंगामात २७ फेब्रुवारीपर्यंत ७०७.२४ लाख टन भाताची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या खरेदीपैकी सर्वाधिक १८६.८५ लाख टन भाताची खरेदी पंजाब राज्यातून करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ छत्तीसगडमधून ९२.०१ लाख टन, तेलंगाणातून ७०.२२ लाख टन हरियाणातून ५५.३० लाख टन आणि ६४.९३ लाख टन भाताची खरेदी ही उत्तर प्रदेशमधून करण्यात आली आहे. मागील विपणन हंगामात (२०२०-२१) सरकारने किमान आधारभूत किमतीने ८९५.८३ लाख टन भाताची खरेदी केली होती. ज्याचे मूल्य एक लाख ६९ हजार १३३ कोटी रुपये इतके होते. देशात भात खरेदी विपणन हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत चालतो. भारतीय अन्न महामंडळ तसेच राज्य सरकारच्या इतर खरेदी एजन्सीच्या मार्फतकेंद्र सरकार खेरदीची प्रक्रिया राबवते. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचे संरक्षण सरकार गहू आणि तांदळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. सरकार खरेदी केलेले धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना शिधावाटप दुकानातून अनुदानित दराने वितरणासाठी वापरते.
0 comments:
Post a Comment