1. राज्यात उन्हानं अंगाची लाहीलाही झाल्यावर आता सोमवार ७ आणि मंगळवार ८ मार्चला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाच्या शक्यतेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं कायम ठेवलाय. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातलं सकाळचं ढगाळ हवामान आजही कायम असल्याचं नागपूर वेधशाळेच्या माहितीवरून स्पष्ट होतंय. मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यात सूर्य आग ओकतोय. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार गेलंय. त्यामुळे भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत आहे.
Daily Weather Video (Hindi) Dated 04.03.2022
Youtube Link:https://t.co/TsVaaYG9pE
Facebook Link: https://t.co/1TvI8y2wH6
— India Meteorological Department (@Indiametdept) March 4, 2022
2. भारतातून होणाऱ्या साखर निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्मानं वर्तवलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१-२२ या बाजार वर्षात साखर निर्यातीत वाढ होऊन ७५ लाख टनांपर्यंत साखर निर्यात होऊ शकते, असा इस्माचा होरा आहे. जगात साखरेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे भारतीय साखरेला मागणी राहण्याची शक्यता आहे. देशातून ६० लाख टन साखर निर्यातीच्या करारांपैकी आत्तापर्यंत ४२ लाख टन साखरेची निर्यात झाली असल्याची माहितीही इस्मानं दिलीय.
हे देखील वाचा : साखर उत्पादनात सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर
3. रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधले सूर्यफूल गाळप प्लांट ठप्प झालेत. त्यामुळे युद्ध संपेपर्यंत तरी युक्रेनचं सूर्यफूल तेल मिळणं अवघड आहे. तसंच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सूर्यफूल लागवडीवर युद्धाचा परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलंय. रशिया आणि युक्रेनचे युद्ध नवव्या दिवशीही सुरू असून युक्रेनमधील सूर्यफूल तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली. युक्रेन सूर्यफूल तेल उत्पादनात जगात आघाडीवर आहे.
हे देखील वाचा : सूर्यफूल तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
4. बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसल्यामुळे या वर्षी काजूचे उत्पादन कमी झाले असून, हंगामदेखील लांबला आहे. मात्र उत्पादन कमी असून देखील काजू बीचे दर वाढलेले नाहीत. उलट गेल्या आठवड्यापेक्षा प्रति किलोमागे पाच रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे दरातील चढउताराबाबत काजू उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. इंडियन व्हेज ऑईल प्रोड्युसर्स असोसिएशन अर्थात आयव्हिपीएच्या अंदाजानुसार नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान भारतात खाद्यतेलाच्या आयातीत घट होऊ शकते. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई म्हणाले की भारतात यावर्षी भारतात खाद्यतेलाची १२९ लाख टन आयात होऊ शकते. गेल्या वर्षी हाच आकडा १४० लाख टनांचा राहिलाय. यापैकी पाम तेलाचं प्रमाण ७६ लाख टन असेल, तर १५ लाख टन सूर्यफूल तेल आयात होईल. पाम तेलाच्या भावाच्या तुलनेत सोया तेल परवडत असल्यानं सोया तेलाच्या आयातीचं प्रमाण वाढू शकतं. गेल्या वर्षी ३१ लाख टन सोया तेलाची आयात झाली होती, तर यंदा हाच आकडा ३८ लाख टनांचा राहिलाय. तर देशांतर्गत वनस्पतीजन्य तेलांचं उत्पादन यंदा ९२ लाख टन राहील, असा आयव्हिपीएचा अंदाज असल्याचं देसाईंनी म्हटलंय.
1. राज्यात उन्हानं अंगाची लाहीलाही झाल्यावर आता सोमवार ७ आणि मंगळवार ८ मार्चला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाच्या शक्यतेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं कायम ठेवलाय. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातलं सकाळचं ढगाळ हवामान आजही कायम असल्याचं नागपूर वेधशाळेच्या माहितीवरून स्पष्ट होतंय. मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यात सूर्य आग ओकतोय. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार गेलंय. त्यामुळे भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत आहे.
Daily Weather Video (Hindi) Dated 04.03.2022
Youtube Link:https://t.co/TsVaaYG9pE
Facebook Link: https://t.co/1TvI8y2wH6
— India Meteorological Department (@Indiametdept) March 4, 2022
2. भारतातून होणाऱ्या साखर निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्मानं वर्तवलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१-२२ या बाजार वर्षात साखर निर्यातीत वाढ होऊन ७५ लाख टनांपर्यंत साखर निर्यात होऊ शकते, असा इस्माचा होरा आहे. जगात साखरेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे भारतीय साखरेला मागणी राहण्याची शक्यता आहे. देशातून ६० लाख टन साखर निर्यातीच्या करारांपैकी आत्तापर्यंत ४२ लाख टन साखरेची निर्यात झाली असल्याची माहितीही इस्मानं दिलीय.
हे देखील वाचा : साखर उत्पादनात सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर
3. रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधले सूर्यफूल गाळप प्लांट ठप्प झालेत. त्यामुळे युद्ध संपेपर्यंत तरी युक्रेनचं सूर्यफूल तेल मिळणं अवघड आहे. तसंच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सूर्यफूल लागवडीवर युद्धाचा परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलंय. रशिया आणि युक्रेनचे युद्ध नवव्या दिवशीही सुरू असून युक्रेनमधील सूर्यफूल तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली. युक्रेन सूर्यफूल तेल उत्पादनात जगात आघाडीवर आहे.
हे देखील वाचा : सूर्यफूल तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
4. बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसल्यामुळे या वर्षी काजूचे उत्पादन कमी झाले असून, हंगामदेखील लांबला आहे. मात्र उत्पादन कमी असून देखील काजू बीचे दर वाढलेले नाहीत. उलट गेल्या आठवड्यापेक्षा प्रति किलोमागे पाच रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे दरातील चढउताराबाबत काजू उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. इंडियन व्हेज ऑईल प्रोड्युसर्स असोसिएशन अर्थात आयव्हिपीएच्या अंदाजानुसार नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान भारतात खाद्यतेलाच्या आयातीत घट होऊ शकते. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई म्हणाले की भारतात यावर्षी भारतात खाद्यतेलाची १२९ लाख टन आयात होऊ शकते. गेल्या वर्षी हाच आकडा १४० लाख टनांचा राहिलाय. यापैकी पाम तेलाचं प्रमाण ७६ लाख टन असेल, तर १५ लाख टन सूर्यफूल तेल आयात होईल. पाम तेलाच्या भावाच्या तुलनेत सोया तेल परवडत असल्यानं सोया तेलाच्या आयातीचं प्रमाण वाढू शकतं. गेल्या वर्षी ३१ लाख टन सोया तेलाची आयात झाली होती, तर यंदा हाच आकडा ३८ लाख टनांचा राहिलाय. तर देशांतर्गत वनस्पतीजन्य तेलांचं उत्पादन यंदा ९२ लाख टन राहील, असा आयव्हिपीएचा अंदाज असल्याचं देसाईंनी म्हटलंय.
0 comments:
Post a Comment