1. यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा चटका तिव्र होण्याची शक्यता जास्त असल्याचं हवामानशास्त्र विभागानं (IMD) म्हटलंय. त्याची प्रचिती येत असून आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा पस्तीस अंश सेल्सिअसच्या पार गेला होता. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान तीस अंश सेल्सिअसच्या पार होते. ही बातमी देईपर्यंत मुंबई वेधशाळेनं उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिलाय.
Daily Weather Video (Hindi) Dated 02.03.2022
You Tube Link: https://t.co/XwTHcwtxcn
Facebook Link: https://t.co/DsFRhVyw4T— India Meteorological Department (@Indiametdept) March 2, 2022
2. यंदाच्या गाळप हंगामात परभणी जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ऊस तोडीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. परिणामी अजूनही हजारो हेक्टरवरील ऊस शेतात उभा असून ऊसतोडीसाठी कारखाने चालढकल करत असल्यामुळे शेकडो हेक्टरवरील उभा ऊस वाळून जात आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. हीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातील सासवड आणि बारामती भागातही दिसून आली आहे. या भागात उसाला तुरा लागला असून गाळप हंगाम संपत आला तरी शेतात ऊस उभाच असल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय.
हे देखील वाचा : ऊस गाळपाचे नियोजन करा : मुंडे
3. दिवसा कडकडीत ऊन आणि रात्री गारवा अशा हवामानाचा फटका रत्नागिरीतील आंबा पिकाला (mango crop) बसला असून अगदी सुपारी एवढी कैरीही गळून जात आहे. याचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. कैरी गळून जाण्याबरोबरच फुलकीडी, तुडतुड्याचा (thrips) मोठा अटॅक होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवताना बागायतदारांना कसरत करावी लागत आहे.
हे देखील वाचा : घराघरांत ‘जल जीवन’ पोहचवा : हदगल
4. नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागांचं ऐन हंगामात २६ हजार एकरावर नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा पीक संरक्षण खर्च केला. आता द्राक्षमाल (nasik grapes) काढणीसाठी तयार आहे. मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यानं द्राक्ष हंगाम दराअभावी शेतकऱ्यांसाठी आंबट ठरतोय. जिल्ह्यात १ लाख ५४ हजार एकरांवर द्राक्ष बागांच्या लागवडी आहेत. त्यापैकी पावसामुळे हजारो हेक्टरला फटका बसला. अशा आव्हानात्मक परिस्थितीत एकरी उत्पादन खर्च वाढता राहिला. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अतिरिक्त पीक संरक्षण खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांना ३०० कोटींच्या आसपास झळ बसली. असं असलं तरी पडेल दरानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवलीय.
हे देखील वाचा : हमीभावाने तूर खेरदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद
5. कालच्या महाशिवरात्रीच्या सुट्टीनंतर आज राज्यातल्या सरकारी बाजार समित्या पुन्हा सुरू झाल्या. सुरू होताच तुरीच्या आवकेचा ओघ (pigeon pea market) मागच्या आठवड्याप्रमाणेच चालू राहिल्याचं दिसलं. आज नागपूर बाजार समितीत 3910 क्विंटलची राज्यातली सर्वात जास्त तूर आवक झाली. आवक मालाला (tur arrivals) कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 6602 रुपयांच्या दरम्यान भाव राहिला. तर सर्वात जास्त व्यवहार 6452 रुपये क्विंटलनं झाले. त्यापाठोपाठ अकोला बाजारात 2887 क्विंटल आवक तुरीचा भाव 5300 ते 6650 च्या दरम्यान राहिला. या मालाची सर्वसाधारण भावपातळी 6200 रुपयांची होती. त्याचबरोबर पलिकडे कारंजा बाजार समितीत 2070 आवक मालाला 5610 ते 6630 रुपयांचा भाव होता. तसंच सर्वसाधारण भाव 6405 रुपयांचा राहिला.
No comments:
Post a Comment