सीताफळाचे अधिक आणि चांगले उत्पादनासाठी बहर धरण्यापूर्वी आणि धरताना बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे पिकामध्ये काही शारीरिक विकृती निर्माण होतात.
सीताफळात येणाऱ्या शारीरिक विकृती व त्यांची कारणे जाणून घ्यावीत. त्यानुसार त्यांच्यावर उपाययोजना करता येते.
कमी फळधारणा :
सीताफळास फळे लागणे व टिकून राहणे यासाठी आर्द्रतायुक्त हवामानाची गरज आहे. सीताफळास फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत फुलांचा बहर येतो व या कालावधीत हवेतील तापमान जास्त आणि आर्द्रता कमी असते. फळांच्या फुलांमध्ये स्त्री बीजांड पुंकेसरापेक्षा अगोदर तयार झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात परागीभवन होत नाही. फुले टप्प्याटप्प्याने उमलतात. यामुळे परागीभवनाची क्रिया मंदावते. परिणामी फळधारणा कमी होते.
फळे काळी पडणे (स्टोन फ्रूट) :
सीताफळाची काही फळे झाडावरच काळी पडून वाळून जातात. ही फळे पिकत नाहीत व तशीच लहान स्थितीत पानगळ होईपर्यंत राहतात. अशी फळे दगडासारखी टणक दिसतात, म्हणून त्यांना स्टोनफ्रूट म्हणतात. अन्नद्रव्यांचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती अधिक प्रमाणात दिसून येते.
फळे तडकणे :
फळांची काढणी वेळेवर न झाल्यास तसेच फळवाढीच्या काळात पाण्याचा मोठा खंड पडल्यास किंवा मोठ्या खंडानंतर जास्त पाऊस झाल्यास फळे तडकतात.
फांद्या उकलणे :
झाडाच्या कच्च्या जोडाच्या जागा जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उकलतात. त्या जागी झाडाला जखम तयार होते.
फळे पिवळी पडणे :
हलक्या जमिनीत पानांची वाढ जोमदार होत नाही. अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास फळे सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर पिवळी पडतात. आकाराने लहान राहतात.
उपाययोजना :
- योग्य मशागत, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
- योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
- बागेतील ओलावा टिकणेसाठी आच्छादनाचा वापर करावा. आर्द्रता राखणेसाठी बागेत बाजरीसारखी आंतरपिके घ्यावीत.
- उकललेल्या / मोडलेल्या फांद्या काढून त्यावर कॉपर ऑक्सिक्लोराईड (२.५ ग्रॅम प्रतिलिटर) लेप लावावा.
- परागीभवन वाढविण्यासाठी मधमाश्यांचे संगोपन तसेच हाताने परागीभवन करावे.
संपर्क : डॉ. सुनील लोहाटे, ९४२२०७१०२८
(अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, जि. पुणे)


सीताफळाचे अधिक आणि चांगले उत्पादनासाठी बहर धरण्यापूर्वी आणि धरताना बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे पिकामध्ये काही शारीरिक विकृती निर्माण होतात.
सीताफळात येणाऱ्या शारीरिक विकृती व त्यांची कारणे जाणून घ्यावीत. त्यानुसार त्यांच्यावर उपाययोजना करता येते.
कमी फळधारणा :
सीताफळास फळे लागणे व टिकून राहणे यासाठी आर्द्रतायुक्त हवामानाची गरज आहे. सीताफळास फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत फुलांचा बहर येतो व या कालावधीत हवेतील तापमान जास्त आणि आर्द्रता कमी असते. फळांच्या फुलांमध्ये स्त्री बीजांड पुंकेसरापेक्षा अगोदर तयार झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात परागीभवन होत नाही. फुले टप्प्याटप्प्याने उमलतात. यामुळे परागीभवनाची क्रिया मंदावते. परिणामी फळधारणा कमी होते.
फळे काळी पडणे (स्टोन फ्रूट) :
सीताफळाची काही फळे झाडावरच काळी पडून वाळून जातात. ही फळे पिकत नाहीत व तशीच लहान स्थितीत पानगळ होईपर्यंत राहतात. अशी फळे दगडासारखी टणक दिसतात, म्हणून त्यांना स्टोनफ्रूट म्हणतात. अन्नद्रव्यांचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती अधिक प्रमाणात दिसून येते.
फळे तडकणे :
फळांची काढणी वेळेवर न झाल्यास तसेच फळवाढीच्या काळात पाण्याचा मोठा खंड पडल्यास किंवा मोठ्या खंडानंतर जास्त पाऊस झाल्यास फळे तडकतात.
फांद्या उकलणे :
झाडाच्या कच्च्या जोडाच्या जागा जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उकलतात. त्या जागी झाडाला जखम तयार होते.
फळे पिवळी पडणे :
हलक्या जमिनीत पानांची वाढ जोमदार होत नाही. अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास फळे सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर पिवळी पडतात. आकाराने लहान राहतात.
उपाययोजना :
- योग्य मशागत, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
- योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
- बागेतील ओलावा टिकणेसाठी आच्छादनाचा वापर करावा. आर्द्रता राखणेसाठी बागेत बाजरीसारखी आंतरपिके घ्यावीत.
- उकललेल्या / मोडलेल्या फांद्या काढून त्यावर कॉपर ऑक्सिक्लोराईड (२.५ ग्रॅम प्रतिलिटर) लेप लावावा.
- परागीभवन वाढविण्यासाठी मधमाश्यांचे संगोपन तसेच हाताने परागीभवन करावे.
संपर्क : डॉ. सुनील लोहाटे, ९४२२०७१०२८
(अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, जि. पुणे)
0 comments:
Post a Comment