शेतामध्ये करण्यात येणारे यशस्वी प्रयोगच कालांतराने “आधुनिक तंत्रज्ञान” म्हणून ओळखले जाते. मल्चिंग पेपरच्या वापराने करण्यात येणारी भात शेती हि शेतकरी बांधवांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. मल्चिंग भात शेती तंत्रज्ञानामुळे लागणारा वेळ, मजुरांची अनुपलब्धता आणि दिवसागणिक वाढत जाणारा खर्च यांसारख्या समस्यांवर निश्चित तोडगा निघू शकतो. या तंत्रज्ञानाच्या अवलंबाने केवळ खर्चात कपात होत नाही तर कमी वेळात दर्जेदार उत्पादन आल्याने चांगला नफा मिळतो.
मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान
- नांगरणी आणि कुळवणी केल्यानंतर गादीवाफे तयार करावेत.
- ४.५ फुटांवर सरी खणून घ्याव्यात.
- गादीवाफ्यांची रुंदी ३ फुटांपर्यंत ठेवावी.
- दोन गादीवाफ्यांमधील अंतर १.५ फूट ठेवावे.
- यानंतर गादीवाफ्यांवर मल्चिंग पेपर अंथरावा.
- पाऊस झाल्यानंतर मल्चिंग पेपर वर १ X १ फुटावर साधारण २ इंचाची छिद्र पाडावीत.
- मातीमध्ये अपेक्षित ओलावा निर्माण झाल्यानंतर प्रत्येक छिद्रात ४–५ बियाणे टाकावीत.
- बियाण्याची लागवड केल्यानंतर १५ दिवसात युरियाचा हफ्ता द्यावा.
- दोन गादीवाफ्यांच्या मध्ये छोटी छिद्रे करून युरिया ब्रिकेट्स टाकावे.
- एक एकरसाठी साधारण ६५ किलो युरिया लागू शकतो.
- “कर्जत – ३” हि भाताची जात साधारणपणे ११०–१२० दिवसात तयार होते.
0 comments:
Post a Comment