Thursday, November 15, 2018

पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन

पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती, खते व पाणी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातील पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते.

पाण्याशिवाय वनस्पती फार काळ जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक पिकांची पाण्याची गरज ठरावीक असते. ती सर्वसाधारणपणे पीक, जमिनीचा प्रकार, पिकांच्या वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलत असते. या वर्षी पाऊसमान कमी राहिल्याने बहुतांश विभागातील विहिरीतील पाण्याची पातळी कमी आहे. अनेकांनी शेततळ्याचे नियोजन केलेले असले तरी पाण्याचा साठाही मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. त्यातून कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळवणे शक्य होऊ शकते.
पिकासाठी पाण्याची नेमकी किती आवश्यकता असते त्यानुसार उपलब्ध पाण्याच्या किती पाळ्या मिळू शकतात, यानुसार रब्बी हंगामामध्ये पिकाची निवड करणे अपेक्षित असते. उदा. हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, मोहरी, गहू, सूर्यफूल

पीकवाढीनुसार पाण्याचे नियोजन

  • वनस्पती पाणी मुळाद्वारे उचलतात, त्यामुळे जमीन ओलावताना मुळाच्या वाढीप्रमाणे तेवढ्याच खोलीचे पाणी पिकास देणे फायद्याचे असते.
  • मुळांच्या वाढीपेक्षा जास्त खोलवर दिलेले पाणी हे पिकांच्या दृष्टीने अनुत्पादक आणि जमिनीच्या दृष्टीने अपायकारक ठरते.
  • पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये कमी खोलीचे पाणी द्यावे. पिकाच्या वाढीनुसार पाण्याची खोली वाढवावी. या पद्धतीमुळे पाणी दिल्यास पाण्यामध्ये मोठी बचत होते.
  • सर्वसाधारणपणे रोप अवस्थेत सर्वच पिकांची पाण्याची गरज कमी असते. पुढे हळूहळू ती वाढत जाते. त्यानंतर पीक पक्व होण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज कमी होते.
  • पाणी देण्याची वेळ ठरविताना जमिनीतील ओलावा आणि पिकांच्या पाण्यास संवेदनशील अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे.

पिकांच्या संवेदनशील अवस्थेत
पाणी देण्याची वेळ

  • पिकाच्या पाण्याच्या संवेदनशील अवस्था वेगवेगळ्या असतात. या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्यास सर्वच संवेदनशील अवस्थेतही पाणी देणे शक्य होत नाही. अशा वेळी  नियोजन करताना कोणत्या अवस्था अत्यंत संवेदनशील आहेत, हे जाणून घ्यावे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळू शकते.
  • एक किंवा दोन पाणी उपलब्ध असतील, तर ते पिकांच्या नाजूक अवस्थेत द्यावे. उदा. रोपावस्था, फुलोऱ्यात किंवा दाणे भरताना.

पाणी देण्याच्या पद्धती

  • उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून घेण्यासाठी पाणी योग्य पद्धतीचा अवलंब करावा.
  • शेतकरी बऱ्याच पिकांना मोकाट पद्धतीने पाणी देतात. या पद्धतीत आपण पिकांऐवजी संपूर्ण शेताला पाणी देत असतो. त्यात पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीची धूप होते. जमिनीचा पोत खराब होतो. शेतात तणाचे प्रमाण वाढते.
  • निरनिराळ्या पिकांना शास्त्रीय पद्धतीचा वापर करून पाणी द्यावे. परिणामी उपलब्ध पाण्यात जास्त क्षेत्र भिजवता येते. पिकांचे व जमिनीचे नुकसान न होता अधिक उत्पादन मिळू शकते.
  • सारे पद्धत : गहू, मोहरी, ज्वारी, हरभरा
  • वाफे पद्धत : सूर्यफूल , मोहरी, ज्वारी, हरभरा
  • सरी वरंबा पद्धत : करडई, सूर्यफूल    
  • रुंद वाफे : करडई, हरभरा
  • सरी वरंबा: (दोन ओळींनंतर सरीतून पाणी देणे), करडई, हरभरा
पीक एकूण पाण्याची गरज
(सेंमी/हे.) 
एकूण
पाळ्या 
दोन पाळ्यांतील
अंतर (दिवस)
गहू  ४५-६० ५-६  १५-१८
रब्बी ज्वारी  ३५-४० ३-४ २०-२५
हरभरा ३०-४०    ३  २०-२५
मोहरी  ३०-३५  ३-४ २०-२५
करडई ४०-४५ ३०
सूर्यफूल ४०-६० ४-५  २०

अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ 
डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७०
(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

News Item ID: 
18-news_story-1542278805
Mobile Device Headline: 
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती, खते व पाणी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातील पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते.

पाण्याशिवाय वनस्पती फार काळ जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक पिकांची पाण्याची गरज ठरावीक असते. ती सर्वसाधारणपणे पीक, जमिनीचा प्रकार, पिकांच्या वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलत असते. या वर्षी पाऊसमान कमी राहिल्याने बहुतांश विभागातील विहिरीतील पाण्याची पातळी कमी आहे. अनेकांनी शेततळ्याचे नियोजन केलेले असले तरी पाण्याचा साठाही मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. त्यातून कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळवणे शक्य होऊ शकते.
पिकासाठी पाण्याची नेमकी किती आवश्यकता असते त्यानुसार उपलब्ध पाण्याच्या किती पाळ्या मिळू शकतात, यानुसार रब्बी हंगामामध्ये पिकाची निवड करणे अपेक्षित असते. उदा. हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, मोहरी, गहू, सूर्यफूल

पीकवाढीनुसार पाण्याचे नियोजन

  • वनस्पती पाणी मुळाद्वारे उचलतात, त्यामुळे जमीन ओलावताना मुळाच्या वाढीप्रमाणे तेवढ्याच खोलीचे पाणी पिकास देणे फायद्याचे असते.
  • मुळांच्या वाढीपेक्षा जास्त खोलवर दिलेले पाणी हे पिकांच्या दृष्टीने अनुत्पादक आणि जमिनीच्या दृष्टीने अपायकारक ठरते.
  • पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये कमी खोलीचे पाणी द्यावे. पिकाच्या वाढीनुसार पाण्याची खोली वाढवावी. या पद्धतीमुळे पाणी दिल्यास पाण्यामध्ये मोठी बचत होते.
  • सर्वसाधारणपणे रोप अवस्थेत सर्वच पिकांची पाण्याची गरज कमी असते. पुढे हळूहळू ती वाढत जाते. त्यानंतर पीक पक्व होण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज कमी होते.
  • पाणी देण्याची वेळ ठरविताना जमिनीतील ओलावा आणि पिकांच्या पाण्यास संवेदनशील अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे.

पिकांच्या संवेदनशील अवस्थेत
पाणी देण्याची वेळ

  • पिकाच्या पाण्याच्या संवेदनशील अवस्था वेगवेगळ्या असतात. या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्यास सर्वच संवेदनशील अवस्थेतही पाणी देणे शक्य होत नाही. अशा वेळी  नियोजन करताना कोणत्या अवस्था अत्यंत संवेदनशील आहेत, हे जाणून घ्यावे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळू शकते.
  • एक किंवा दोन पाणी उपलब्ध असतील, तर ते पिकांच्या नाजूक अवस्थेत द्यावे. उदा. रोपावस्था, फुलोऱ्यात किंवा दाणे भरताना.

पाणी देण्याच्या पद्धती

  • उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून घेण्यासाठी पाणी योग्य पद्धतीचा अवलंब करावा.
  • शेतकरी बऱ्याच पिकांना मोकाट पद्धतीने पाणी देतात. या पद्धतीत आपण पिकांऐवजी संपूर्ण शेताला पाणी देत असतो. त्यात पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीची धूप होते. जमिनीचा पोत खराब होतो. शेतात तणाचे प्रमाण वाढते.
  • निरनिराळ्या पिकांना शास्त्रीय पद्धतीचा वापर करून पाणी द्यावे. परिणामी उपलब्ध पाण्यात जास्त क्षेत्र भिजवता येते. पिकांचे व जमिनीचे नुकसान न होता अधिक उत्पादन मिळू शकते.
  • सारे पद्धत : गहू, मोहरी, ज्वारी, हरभरा
  • वाफे पद्धत : सूर्यफूल , मोहरी, ज्वारी, हरभरा
  • सरी वरंबा पद्धत : करडई, सूर्यफूल    
  • रुंद वाफे : करडई, हरभरा
  • सरी वरंबा: (दोन ओळींनंतर सरीतून पाणी देणे), करडई, हरभरा
पीक एकूण पाण्याची गरज
(सेंमी/हे.) 
एकूण
पाळ्या 
दोन पाळ्यांतील
अंतर (दिवस)
गहू  ४५-६० ५-६  १५-१८
रब्बी ज्वारी  ३५-४० ३-४ २०-२५
हरभरा ३०-४०    ३  २०-२५
मोहरी  ३०-३५  ३-४ २०-२५
करडई ४०-४५ ३०
सूर्यफूल ४०-६० ४-५  २०

अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ 
डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७०
(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

English Headline: 
agriculture story in marathi, water management of different rabi field crops
Author Type: 
External Author
अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच.पठाण
Twitter Publish: 


0 comments:

Post a Comment