जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात चवळी व कारल्यांची आवक कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. कारल्यांना प्रतिक्विंटल २८०० रुपये तर चवळीलाही सरासरी २६०० रुपये दर मिळाला.
कारल्यांची आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल भागांतून होत आहे. आवक मागील दीड ते दोन महिन्यांपासून कमी किंवा स्थिर आहे. कारल्यांना एकच दर मिळत आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन चार क्विंटल सरासरी आवक झाली. दर २८०० रुपये प्रतिक्विंटलचे मिळाले. त्यांना चांगला उठाव आहे. पुढे कारल्यांची आवक आणखी कमी होऊ शकते.
चवळीची आवक औरंगाबादमधील घाट परिसरातील गावे, पाचोरा व यावल भागांतून होते. आवक प्रतिदिन चार क्विंटलपर्यंतच झाली. प्रतिक्विंटल २००० ते २८००० रुपये आणि सरासरी २६०० रुपये दर मिळाला. चवळीची आवकही स्थिर असल्याने दर टिकून असल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले.
भेंडीची प्रतिदिन १८ क्विंटलपर्यंत आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. आवकेत काहीशी वाढ दिसून आली. वाल शेंगांची प्रतिदिन नऊ क्विंटलपर्यंत आवक झाली. या शेंगांची आवकही काहीशी वाढली. वाल शेंगांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. कोथिंबीर, मेथीची आवकही स्थिर होती.
मेथीची प्रतिदिन आठ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल १००० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. तर कोथिंबिरीची प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत आवक होती. कोथिंबिरलादेखील ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. पपईची आवक काहीशी कमी झाली. पपईला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. आवक प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत झाली. पपईची आवक यावल, पाचोरा, जळगाव भागांतून झाली.
१० दिवसांपासून केळीचे दर ९२० रुपये
मागील १०-१२ दिवसांपासून रावेरात नवती केळीचे दर ९२० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. नवती केळीची आवक कमी अधिक होत आहे. परंतु जसजशी उत्तरेकडील धुके व थंडी कमी होत आहे, तशी केळीची वाहतूक गती घेत आहे. केळीबाबत सध्या अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेर, यावल भागांत अर्ली नवती केळीमध्ये काढणी सुरू आहे. तसेच मुक्ताईनगरातही काढणीला सुरवात झाली आहे.
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात चवळी व कारल्यांची आवक कमी राहिली. परिणामी दर टिकून होते. कारल्यांना प्रतिक्विंटल २८०० रुपये तर चवळीलाही सरासरी २६०० रुपये दर मिळाला.
कारल्यांची आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल भागांतून होत आहे. आवक मागील दीड ते दोन महिन्यांपासून कमी किंवा स्थिर आहे. कारल्यांना एकच दर मिळत आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन चार क्विंटल सरासरी आवक झाली. दर २८०० रुपये प्रतिक्विंटलचे मिळाले. त्यांना चांगला उठाव आहे. पुढे कारल्यांची आवक आणखी कमी होऊ शकते.
चवळीची आवक औरंगाबादमधील घाट परिसरातील गावे, पाचोरा व यावल भागांतून होते. आवक प्रतिदिन चार क्विंटलपर्यंतच झाली. प्रतिक्विंटल २००० ते २८००० रुपये आणि सरासरी २६०० रुपये दर मिळाला. चवळीची आवकही स्थिर असल्याने दर टिकून असल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले.
भेंडीची प्रतिदिन १८ क्विंटलपर्यंत आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. आवकेत काहीशी वाढ दिसून आली. वाल शेंगांची प्रतिदिन नऊ क्विंटलपर्यंत आवक झाली. या शेंगांची आवकही काहीशी वाढली. वाल शेंगांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. कोथिंबीर, मेथीची आवकही स्थिर होती.
मेथीची प्रतिदिन आठ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल १००० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. तर कोथिंबिरीची प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत आवक होती. कोथिंबिरलादेखील ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. पपईची आवक काहीशी कमी झाली. पपईला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. आवक प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत झाली. पपईची आवक यावल, पाचोरा, जळगाव भागांतून झाली.
१० दिवसांपासून केळीचे दर ९२० रुपये
मागील १०-१२ दिवसांपासून रावेरात नवती केळीचे दर ९२० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. नवती केळीची आवक कमी अधिक होत आहे. परंतु जसजशी उत्तरेकडील धुके व थंडी कमी होत आहे, तशी केळीची वाहतूक गती घेत आहे. केळीबाबत सध्या अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेर, यावल भागांत अर्ली नवती केळीमध्ये काढणी सुरू आहे. तसेच मुक्ताईनगरातही काढणीला सुरवात झाली आहे.
0 comments:
Post a Comment