सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला मोहोर आल्याचे दिसून येत आहे. तसेच काही बागांमध्ये सध्या फळधारणा सुरू झाली असून, फळे मोहरी अवस्थेत आहेत.
डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र सध्या थंडी कमी होत असल्यामुळे काही बागांमध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सध्याचे हवामान तुडतुड्यांच्या वाढीस पोषक आहे. तसेच काही भागात मोहोर खाणाऱ्या अळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दव पडत असल्यामुळे मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करपा रोगामुळे मोहोर करपल्यासारखा दिसतो.
मोहोरावर अन्नद्रव्यांची फवारणी
फळधारणा झालेल्या कलमांमध्ये फळगळ कमी होऊन फळे पोसण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आम्रशक्ती सूक्ष्मअन्नद्रव्य घटकाची (घटक ः नत्र, स्फुरद, पालाश, कॉपर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम) फवारणी करावी. साधारणपणे २५ लिटर पाण्यात १ लिटर आम्रशक्ती सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण मिसळावे. हे द्रावण चार मोहोरलेल्या कलमांसाठी पुरते. केवळ मोहरावरच फवारणी करावी.
नियंत्रण उपाय
- फवारणी ः प्रतिलिटर पाणी
- तुडतुडे नियंत्रण
- डेल्टामेथ्रिन (२.८ इसी) ः ०.९ मि.लि.
- फुलकिडे
- स्पीनोसॅड (४५ एससी) ०.२५ मिलि
- करपा रोग
- हेक्झाकोनॅझॉल ( ५ इसी) ः ०.५ मिलि
- भुरी रोग
- गंधक (८० टक्के पाण्यात विरघळणारे ) २ ग्रॅम
काजू
कीड नियंत्रण
फवारणी ः प्रमाण प्रति लिटर पाणी
टी मॉस्किटो
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ०.६ मि.लि.
बी आणि बोंडू पोखरणाऱ्या अळी
प्रोफॅनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि.
खोडकिडा
- खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
- खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास पाने पिवळी पडतात. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो.
- पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भावीत साल काढून अळीस बाहेर काढून मारून टाकावे.
- क्लोरपायरीफॉस (२० इसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून साल काढलेला भाग चांगला भिजवावा.
- थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सकाळच्या वेळी काजू बागेत पालापाचोळ्याच्या शेकोट्या पेटवून धूर करावा. त्यामुळे बागेतील तापमान १ ते २ अंशांनी वाढ होऊन नुकसान पातळी कमी करता येते.
- डॉ. ए. वाय. मुंज, ९४२१९१६९४७
- डॉ. बी. एन. सावंत, ९४२२४३६११७
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग


सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला मोहोर आल्याचे दिसून येत आहे. तसेच काही बागांमध्ये सध्या फळधारणा सुरू झाली असून, फळे मोहरी अवस्थेत आहेत.
डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र सध्या थंडी कमी होत असल्यामुळे काही बागांमध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सध्याचे हवामान तुडतुड्यांच्या वाढीस पोषक आहे. तसेच काही भागात मोहोर खाणाऱ्या अळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दव पडत असल्यामुळे मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करपा रोगामुळे मोहोर करपल्यासारखा दिसतो.
मोहोरावर अन्नद्रव्यांची फवारणी
फळधारणा झालेल्या कलमांमध्ये फळगळ कमी होऊन फळे पोसण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आम्रशक्ती सूक्ष्मअन्नद्रव्य घटकाची (घटक ः नत्र, स्फुरद, पालाश, कॉपर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम) फवारणी करावी. साधारणपणे २५ लिटर पाण्यात १ लिटर आम्रशक्ती सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण मिसळावे. हे द्रावण चार मोहोरलेल्या कलमांसाठी पुरते. केवळ मोहरावरच फवारणी करावी.
नियंत्रण उपाय
- फवारणी ः प्रतिलिटर पाणी
- तुडतुडे नियंत्रण
- डेल्टामेथ्रिन (२.८ इसी) ः ०.९ मि.लि.
- फुलकिडे
- स्पीनोसॅड (४५ एससी) ०.२५ मिलि
- करपा रोग
- हेक्झाकोनॅझॉल ( ५ इसी) ः ०.५ मिलि
- भुरी रोग
- गंधक (८० टक्के पाण्यात विरघळणारे ) २ ग्रॅम
काजू
कीड नियंत्रण
फवारणी ः प्रमाण प्रति लिटर पाणी
टी मॉस्किटो
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ०.६ मि.लि.
बी आणि बोंडू पोखरणाऱ्या अळी
प्रोफॅनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि.
खोडकिडा
- खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
- खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास पाने पिवळी पडतात. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो.
- पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भावीत साल काढून अळीस बाहेर काढून मारून टाकावे.
- क्लोरपायरीफॉस (२० इसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून साल काढलेला भाग चांगला भिजवावा.
- थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सकाळच्या वेळी काजू बागेत पालापाचोळ्याच्या शेकोट्या पेटवून धूर करावा. त्यामुळे बागेतील तापमान १ ते २ अंशांनी वाढ होऊन नुकसान पातळी कमी करता येते.
- डॉ. ए. वाय. मुंज, ९४२१९१६९४७
- डॉ. बी. एन. सावंत, ९४२२४३६११७
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग




0 comments:
Post a Comment