जळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली असून, उत्तर भारतासह राज्यातून केळीची मागणी वाढली आहे. नवती केळीचे दर रविवारी (ता. ७) ११८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले.
केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा या भागात वाढली आहे. आवक वाढत असतानाच मागणीदेखील बऱ्यापैकी असून, सावदा (ता. रावेर), फैजपूर (ता. यावल) येथून उत्तर भारतातील पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेशात मागील आठ दिवसांत सरासरी प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक झाली. दिल्ली व पंजाबमधून केळीला उठाव वाढल्याने दरांवरील दबाव दूर झाला. केळी दर जूनच्या सुरवातीला १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते; तर जळगाव, पाचोरा, यावल भागात अनेक शेतकऱ्यांच्या केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदीचे प्रकारही सुरू होते.
सध्या यावल, रावेर, मुक्ताईनगरातून मिळून ३५० ट्रक केळीची आवक होत आहे. या भागात मागील ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळीची काढणी वेगात सुरू आहे. केळीची आवकही वाढत असल्याचे सांगण्यात आले. जळगावलगत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला जाहीर लिलावात बऱ्यापैकी दर मिळत असून, रविवारी कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीला तेथे मिळाले. तेथेही जूनच्या सुरवातीला केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. दर बऱ्यापैकी मिळत असल्याने मुक्ताईनगर व रावेरमधील काही केळी उत्पादक आपली केळी विक्रीसाठी बऱ्हाणपूर येथे पाठवित आहेत.
केळीची परराज्यांत जशी मागणी आहे, तशी राज्यातील ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह राजस्थान, छत्तीसगडमधूनही केळीला उठाव आहे. पावसामुळे उष्णता बऱ्यापैकी कमी झाल्याने केळीचा दर्जाही सुधारल्याने स्थानिक क्षेत्रातसह छत्तीसगड, राजस्थानमधील केळी पिकवणी केंद्रचालकही केळीच्या खरेदीसंबंधी रावेरात आगाऊ नोंदणी करून घेत असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली असून, उत्तर भारतासह राज्यातून केळीची मागणी वाढली आहे. नवती केळीचे दर रविवारी (ता. ७) ११८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले.
केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा या भागात वाढली आहे. आवक वाढत असतानाच मागणीदेखील बऱ्यापैकी असून, सावदा (ता. रावेर), फैजपूर (ता. यावल) येथून उत्तर भारतातील पंजाब, काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेशात मागील आठ दिवसांत सरासरी प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक झाली. दिल्ली व पंजाबमधून केळीला उठाव वाढल्याने दरांवरील दबाव दूर झाला. केळी दर जूनच्या सुरवातीला १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते; तर जळगाव, पाचोरा, यावल भागात अनेक शेतकऱ्यांच्या केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदीचे प्रकारही सुरू होते.
सध्या यावल, रावेर, मुक्ताईनगरातून मिळून ३५० ट्रक केळीची आवक होत आहे. या भागात मागील ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या केळीची काढणी वेगात सुरू आहे. केळीची आवकही वाढत असल्याचे सांगण्यात आले. जळगावलगत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला जाहीर लिलावात बऱ्यापैकी दर मिळत असून, रविवारी कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर दर्जेदार केळीला तेथे मिळाले. तेथेही जूनच्या सुरवातीला केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. दर बऱ्यापैकी मिळत असल्याने मुक्ताईनगर व रावेरमधील काही केळी उत्पादक आपली केळी विक्रीसाठी बऱ्हाणपूर येथे पाठवित आहेत.
केळीची परराज्यांत जशी मागणी आहे, तशी राज्यातील ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह राजस्थान, छत्तीसगडमधूनही केळीला उठाव आहे. पावसामुळे उष्णता बऱ्यापैकी कमी झाल्याने केळीचा दर्जाही सुधारल्याने स्थानिक क्षेत्रातसह छत्तीसगड, राजस्थानमधील केळी पिकवणी केंद्रचालकही केळीच्या खरेदीसंबंधी रावेरात आगाऊ नोंदणी करून घेत असल्याचे सांगण्यात आले.
0 comments:
Post a Comment