Wednesday, January 15, 2020

नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळ

सध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. या वातावरणाचे सध्या द्राक्ष बागेमध्ये असलेल्या विविध स्थितीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.

१) नवीन कलम केलेली बाग

या बागेमध्ये रिकट घेण्याचा कालावधी जवळ येत आहे. रिकट हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेतला जातो. अशा वेळी बागेतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढण्यास सुरुवात होते. परिणामी रिकट नंतर फूट एकसारखी आणि लवकर निघण्यास मदत होते. रिकट घेण्यापूर्वी कलम जोडाच्या वर ६ ते ७ पेरे परिपक्व असल्यास नवीन निघणाऱ्या फुटींवर चांगले परिणाम दिसून येतात. ज्या बागेत ही परिस्थिती उपलब्ध नाही, अशा ठिकाणी रिकट थोडा उशिरा घ्यावा. या पू्र्वी वेलीवर पोटॅशिअम सल्फेट (०-०-५०) ची ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या घ्याव्यात. फुटींचा शेंडा वाढत असल्यास शेंडा पिचिंग करून घ्यावे.

कलम जोडाच्या वर काडी परिपक्व झालेली असल्यास रिकटची तयारी करावी. या वेळी दोन वेलीमध्ये ३ ते ४ इंच खोल व २ फूट रुंदीची चारी वेलींच्या खोडापासून ८ ते ९ इंच अंतर सोडून घ्यावी. या चारीमध्ये साधारणतः दीड घमेले शेणखत, २०० ते २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १५ किलो फेरस सल्फेट टाकून त्यावर हलकासा मातीचा थर टाकून झाकून घ्यावे. यामुळे तयार झालेल्या बोदामध्ये हवा खेळती राहून पांढरी मुळे शक्य तितक्या लवकर तयार होतील. पुढील काळामध्ये ती जमिनीतून अन्नद्रव्ये उचलून घेतील. ही कार्यवाही रिकट पूर्वी किमान १५ दिवस आधी करावी.

ज्या ठिकाणी रिकट घ्यावयाचा आहे, अशा बागेमध्ये पानगळ करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुले काडीवरील डोळे फुगण्यास मदत होईल. रिकटनंतर नवीन फुटील लवकर निघतील. आवश्यकता भासल्यास पानगळीसाठी वेलीवर इथेफॉन २.५ ते ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करता येईल.

२) जुनी बाग

या बागेत पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत सुकवा दिसून येईल. ज्या बागेत घडांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक आहे, अशा बागेमध्ये सुकव्याचे प्रमाण अधिक असेल. या प्रमाणे काही बागांमध्ये यापूर्वीचे शिल्लक डाऊनी मिल्ड्यूचे अंश कार्यान्वित झाल्याची स्थिती असून, मण्याचे देठ काळपट झाल्याचे दिसून येत आहे. डाऊनीचे जिवाणू देठातील रस शोषून घेतला असल्यास मण्याची पकड कमी होईल. परिणामी सुकवा झाल्याची स्थिती दिसून येईल. या स्थितीमध्ये बागायतदार कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची फवारणी करताना दिसून येतात. मात्र, मण्यातील पेशी जुन्या झाल्यामुळे यावेळी या अन्नद्रव्यांचे शोषण करणे शक्य होतन नाही. म्हणजेच वापरलेल्या खतांचा फायदा वेलीला होत नाही. ५ ते ६ मि.मी. आकारापासून १४ ते १५ मि.मी आाकारापर्यंत कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांची फवारणी फायदेशीर ठरते. त्यानंतर वापरलेल्या खतयुक्त फवारणीचा फारसा फायदा होत नाही.

संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

News Item ID: 
820-news_story-1579086537
Mobile Device Headline: 
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळ
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

सध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. या वातावरणाचे सध्या द्राक्ष बागेमध्ये असलेल्या विविध स्थितीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.

१) नवीन कलम केलेली बाग

या बागेमध्ये रिकट घेण्याचा कालावधी जवळ येत आहे. रिकट हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेतला जातो. अशा वेळी बागेतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढण्यास सुरुवात होते. परिणामी रिकट नंतर फूट एकसारखी आणि लवकर निघण्यास मदत होते. रिकट घेण्यापूर्वी कलम जोडाच्या वर ६ ते ७ पेरे परिपक्व असल्यास नवीन निघणाऱ्या फुटींवर चांगले परिणाम दिसून येतात. ज्या बागेत ही परिस्थिती उपलब्ध नाही, अशा ठिकाणी रिकट थोडा उशिरा घ्यावा. या पू्र्वी वेलीवर पोटॅशिअम सल्फेट (०-०-५०) ची ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या घ्याव्यात. फुटींचा शेंडा वाढत असल्यास शेंडा पिचिंग करून घ्यावे.

कलम जोडाच्या वर काडी परिपक्व झालेली असल्यास रिकटची तयारी करावी. या वेळी दोन वेलीमध्ये ३ ते ४ इंच खोल व २ फूट रुंदीची चारी वेलींच्या खोडापासून ८ ते ९ इंच अंतर सोडून घ्यावी. या चारीमध्ये साधारणतः दीड घमेले शेणखत, २०० ते २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १५ किलो फेरस सल्फेट टाकून त्यावर हलकासा मातीचा थर टाकून झाकून घ्यावे. यामुळे तयार झालेल्या बोदामध्ये हवा खेळती राहून पांढरी मुळे शक्य तितक्या लवकर तयार होतील. पुढील काळामध्ये ती जमिनीतून अन्नद्रव्ये उचलून घेतील. ही कार्यवाही रिकट पूर्वी किमान १५ दिवस आधी करावी.

ज्या ठिकाणी रिकट घ्यावयाचा आहे, अशा बागेमध्ये पानगळ करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुले काडीवरील डोळे फुगण्यास मदत होईल. रिकटनंतर नवीन फुटील लवकर निघतील. आवश्यकता भासल्यास पानगळीसाठी वेलीवर इथेफॉन २.५ ते ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करता येईल.

२) जुनी बाग

या बागेत पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत सुकवा दिसून येईल. ज्या बागेत घडांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक आहे, अशा बागेमध्ये सुकव्याचे प्रमाण अधिक असेल. या प्रमाणे काही बागांमध्ये यापूर्वीचे शिल्लक डाऊनी मिल्ड्यूचे अंश कार्यान्वित झाल्याची स्थिती असून, मण्याचे देठ काळपट झाल्याचे दिसून येत आहे. डाऊनीचे जिवाणू देठातील रस शोषून घेतला असल्यास मण्याची पकड कमी होईल. परिणामी सुकवा झाल्याची स्थिती दिसून येईल. या स्थितीमध्ये बागायतदार कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची फवारणी करताना दिसून येतात. मात्र, मण्यातील पेशी जुन्या झाल्यामुळे यावेळी या अन्नद्रव्यांचे शोषण करणे शक्य होतन नाही. म्हणजेच वापरलेल्या खतांचा फायदा वेलीला होत नाही. ५ ते ६ मि.मी. आकारापासून १४ ते १५ मि.मी आाकारापर्यंत कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांची फवारणी फायदेशीर ठरते. त्यानंतर वापरलेल्या खतयुक्त फवारणीचा फारसा फायदा होत नाही.

संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

English Headline: 
agriculture stories in marathi Grapes advice, It is time to take Re cut
Author Type: 
External Author
विलास घुले, डॉ. आर. जी. सोमकुंवर
Search Functional Tags: 
द्राक्ष, किमान तापमान, खत, Fertiliser, सिंगल सुपर फॉस्फेट, Single Super Phosphate, पुणे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
grape advice, Re cut, old vineyard
Meta Description: 
It is time to take Re cut सध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. या वातावरणाचे सध्या द्राक्ष बागेमध्ये असलेल्या विविध स्थितीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.


0 comments:

Post a Comment