Saturday, March 28, 2020

विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला फटका

पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय देशांकडून भारतीय भाजीपाल्याला मोठी मागणी असते. युरोपात कोरोनाचे संकट गडद असताना देखील ही मागणी चांगल्या प्रकारे होती. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने ही निर्यात ठप्प झाली असून निर्यातदार व संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कष्टाने पिकवलेल्या भेंडीला कमी दर मिळत असून प्लॉट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. साहजिकच युरोपात होणाऱ्या भारतीय भाजीपाला निर्यातीला त्याचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला निर्यात क्षेत्रातील आघाडीच्या केबी एक्सपोर्टस् कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव म्हणाले, की युरोपीय देशांत भाजीपाला निर्यातीसाठी फेब्रुवारी ते मे असा भारतासाठी सर्वात मोठा विंडो पिरीयड असतो. या काळात दरवर्षी आम्ही बेबी कॉर्न व भेंडी दररोज पाच ते सहा टन याप्रमाणात निर्यात करतो. मिरचीही असते. यंदा कोरोनाच्या संकटातही २० मार्चपर्यंत आमच्या शेतमालाला चांगली मागणी होती. किंबहुना दरवेळच्या तुलनेत एक ते दोन टनांनी मागणी वाढलेलीच होती. मात्र २० मार्चपासून ही बाजारपेठ आता बंद झाली आहे. त्यामुळे आमचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.    

यादव म्हणाले, की निर्यातीसाठी भेंडीला आम्ही २७ ते २८ रूपये दर शेतकऱ्यांना देऊ केला होता. आता याच भेंडीला स्थानिक बाजारपेठेत १२ रूपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. भेंडी काढणीचा खर्चच किलोला ८ ते ९ रूपये आहे. त्यामुळे भेंडीचे प्लॉट्स सोडून देण्याशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नाही. भारतातून निर्यात ठप्प झाल्याने केनिया, झांबियासारख्या देशांना युरोपात भाजीपाला निर्यातीचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

एकरी अडीच लाखांचे नुकसान
येळे म्हणाले, की मला दरवर्षी निर्यातक्षम भेंडी शेतीतून एकरी दोन ते अडीच लाख रूपये मिळतात. यंदा तेवढ्या रकमेचे नुकसान होणार आहे. दररोज १०० ते १५० किलो भेंडी उपलब्ध होत आहे. पण ती घेण्यासाठी कोणी तयार नाही. सुमारे एक टन भेंडी घरच्या जनावरांनाच खाऊ घातल्याचेही येळे यांनी सांगितले.

News Item ID: 
820-news_story-1585419346-903
Mobile Device Headline: 
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला फटका
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय देशांकडून भारतीय भाजीपाल्याला मोठी मागणी असते. युरोपात कोरोनाचे संकट गडद असताना देखील ही मागणी चांगल्या प्रकारे होती. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने ही निर्यात ठप्प झाली असून निर्यातदार व संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कष्टाने पिकवलेल्या भेंडीला कमी दर मिळत असून प्लॉट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. साहजिकच युरोपात होणाऱ्या भारतीय भाजीपाला निर्यातीला त्याचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला निर्यात क्षेत्रातील आघाडीच्या केबी एक्सपोर्टस् कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव म्हणाले, की युरोपीय देशांत भाजीपाला निर्यातीसाठी फेब्रुवारी ते मे असा भारतासाठी सर्वात मोठा विंडो पिरीयड असतो. या काळात दरवर्षी आम्ही बेबी कॉर्न व भेंडी दररोज पाच ते सहा टन याप्रमाणात निर्यात करतो. मिरचीही असते. यंदा कोरोनाच्या संकटातही २० मार्चपर्यंत आमच्या शेतमालाला चांगली मागणी होती. किंबहुना दरवेळच्या तुलनेत एक ते दोन टनांनी मागणी वाढलेलीच होती. मात्र २० मार्चपासून ही बाजारपेठ आता बंद झाली आहे. त्यामुळे आमचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.    

यादव म्हणाले, की निर्यातीसाठी भेंडीला आम्ही २७ ते २८ रूपये दर शेतकऱ्यांना देऊ केला होता. आता याच भेंडीला स्थानिक बाजारपेठेत १२ रूपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. भेंडी काढणीचा खर्चच किलोला ८ ते ९ रूपये आहे. त्यामुळे भेंडीचे प्लॉट्स सोडून देण्याशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नाही. भारतातून निर्यात ठप्प झाल्याने केनिया, झांबियासारख्या देशांना युरोपात भाजीपाला निर्यातीचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

एकरी अडीच लाखांचे नुकसान
येळे म्हणाले, की मला दरवर्षी निर्यातक्षम भेंडी शेतीतून एकरी दोन ते अडीच लाख रूपये मिळतात. यंदा तेवढ्या रकमेचे नुकसान होणार आहे. दररोज १०० ते १५० किलो भेंडी उपलब्ध होत आहे. पण ती घेण्यासाठी कोणी तयार नाही. सुमारे एक टन भेंडी घरच्या जनावरांनाच खाऊ घातल्याचेही येळे यांनी सांगितले.

English Headline: 
agriculture news in marathi huge losses to vegetable export due to air cargo service break
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, भेंडी, Okra, पुणे, कोरोना, Corona, कंपनी, Company, मिरची, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
huge losses to vegetable export due to air cargo service break
Meta Description: 
huge losses to vegetable export due to air cargo service break भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने ही निर्यात ठप्प झाली असून निर्यातदार व संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कष्टाने पिकवलेल्या भेंडीला कमी दर मिळत असून प्लॉट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


0 comments:

Post a Comment