आंबा
- फळधारणा
- फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये (वाटाणा अवस्था), फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
- उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१ टक्के ) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणे फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना करावी.
- फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. यामुळे फळगळ कमी करणे, फळाचा आकार व वजन वाढणे, डागविरहीत फळे आणि फळामधील साक्याचे प्रमाण कमी करणे तसेच फळमाशीपासून संरक्षण असे अनेक फायदे होतात.
काजू
- फुलोरा ते फळधारणा अवस्था
- काजू पिकामध्ये उशिराने येत असलेल्या नवीन पालवीवर ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पालवीच्या संरक्षणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- हवामान पूर्वानुमानानुसार मोहोर अवस्थेत असलेल्या काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या बंदोबस्तासाठी
- मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- तसेच फळधारणा झालेल्या काजू पिकावर वरील किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)
- काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.
नारळ
- तापमानात वाढ संभवत असल्याने नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात. झावळ्यांचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.
सुपारी
तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
चिकू
- फुलोरा ते फळधारणा
- तापमानात वाढ संभवत असल्याने चिकू बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
- चिकू बागेमध्ये बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता करावी.
- नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणी
- प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १.५ मि. ली. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली किंवा नोव्हॅल्युरॉन (१० टक्के प्रवाही) ०.५ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि. ली.
- टीप ः फवारणी पूर्वी तयार फळांची काढणी करावी.
भाजीपाला
वाल
- काढणी अवस्था
- वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करून ४ ते ५ दिवस शेंगा उन्हात वाळवाव्यात. मळणी करावी. किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून मळणी करावी. साठवणुकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावे.
वांगी
- फळधारणा
- वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.
- कीडग्रस्त शेंडे व फळे जमा करून नष्ट करावीत.
- या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी
- डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली.
भेंडी
- फळधारणा
- उन्हाळी भेंडी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त फळे नष्ट करावीत.
- नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणी
- सायपरमेथ्रीन (२५ टक्के प्रवाही) ०.३ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली.
ः ०२३५८ -२८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)
News Item ID:
820-news_story-1584536637-120
Mobile Device Headline:
कृषी सल्ला (कोकण विभाग)
Mobile Body:
आंबा
- फळधारणा
- फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये (वाटाणा अवस्था), फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
- उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१ टक्के ) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणे फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना करावी.
- फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. यामुळे फळगळ कमी करणे, फळाचा आकार व वजन वाढणे, डागविरहीत फळे आणि फळामधील साक्याचे प्रमाण कमी करणे तसेच फळमाशीपासून संरक्षण असे अनेक फायदे होतात.
काजू
- फुलोरा ते फळधारणा अवस्था
- काजू पिकामध्ये उशिराने येत असलेल्या नवीन पालवीवर ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पालवीच्या संरक्षणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- हवामान पूर्वानुमानानुसार मोहोर अवस्थेत असलेल्या काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या बंदोबस्तासाठी
- मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- तसेच फळधारणा झालेल्या काजू पिकावर वरील किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)
- काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.
नारळ
- तापमानात वाढ संभवत असल्याने नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात. झावळ्यांचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.
सुपारी
तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
चिकू
- फुलोरा ते फळधारणा
- तापमानात वाढ संभवत असल्याने चिकू बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
- चिकू बागेमध्ये बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता करावी.
- नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणी
- प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १.५ मि. ली. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली किंवा नोव्हॅल्युरॉन (१० टक्के प्रवाही) ०.५ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि. ली.
- टीप ः फवारणी पूर्वी तयार फळांची काढणी करावी.
भाजीपाला
वाल
- काढणी अवस्था
- वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करून ४ ते ५ दिवस शेंगा उन्हात वाळवाव्यात. मळणी करावी. किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून मळणी करावी. साठवणुकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावे.
वांगी
- फळधारणा
- वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.
- कीडग्रस्त शेंडे व फळे जमा करून नष्ट करावीत.
- या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी
- डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली.
भेंडी
- फळधारणा
- उन्हाळी भेंडी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त फळे नष्ट करावीत.
- नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणी
- सायपरमेथ्रीन (२५ टक्के प्रवाही) ०.३ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली.
ः ०२३५८ -२८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)
English Headline:
agriculture stories in marathi CROP ADVICE ( kokan region)
Twitter Publish:
0 comments:
Post a Comment