जळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील बाजारात भाजीपाल्यासह गहू, हरभरा, दादर ज्वारीची आवक सुरळीत सुरू आहे. परंतु किरकोळ बाजार बंद असल्याने बाजार समितीमधील दरांवर परिणाम होत आहे.
बाजार समितीने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरांमधील किरकोळ धान्य विक्री व भाजीपाला विक्रीचे बाजार सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असल्याने बाजार समिती बंद केली जाणार नाही. लिलाव सुरूच राहतील. कोरोनासंबंधी सर्व उपाययोजना बाजार समितीत केल्या आहेत, अशी भूमिका मांडली आहे.
किरकोळ बाजारातील भाजीपाला व धान्य विक्री मागील दोन-तीन दिवसात हळूहळू कमी झाली आहे. तसेच मोठ्या गावांमधील आठवडे बाजारही बंद केले आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरात कमालीची घट झाली आहे.
सोमवारी (ता.२३) जळगाव बाजार समितीमध्ये ११ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. तर तिला दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत मिळाले. परंतु मंगळवारी (ता.२४) किरकोळ बाजार बंद झाल्याने बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. लाल कांद्याची सुमारे ५०० क्विंटल आवक झाली.
त्याचे लिलाव सुरळीत झाले. दर कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. धुळे शहर, जळगाव शहर, चोपडा, जामनेर, रावेर, शिरपूर येथील किरकोळ बाजार मंगळवारी बंद ठेवले होते. किरकोळ बाजार बंद असल्याने अनेक ग्राहक सकाळी थेट बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी पोचले होते.
बाजार समितीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्याची आवक सुरळीत आहे. मंगळवारी आवक मात्र काहीशी कमी झाली. गव्हाची सुमारे १०० क्विंटल, ज्वारीची १८० तर हरभऱ्याची ५०० क्विंटल आवक झाली. चोपडा, अमळनेरात आवक कमी होती. तर धुळे येथेही फारशी धान्याची आवक झाली नाही. यामुळे धान्य बाजारातील लिलाव पूर्वीसारखे झाले नाहीत. भाजीपाल्याचे लिलाव सकाळीच झाले. परंतु दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.
परराज्य व परजिल्ह्यातून बटाटा, लसूण, घेवडा, कोबी, वाल यांची मोठी आवक होत असते. परंतु ही आवक मंगळवारी झाली नाही. बटाट्याचे कुठलेही लिलाव जळगाव बाजार समितीमध्ये झाले नसल्याची माहिती मिळाली.
जळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील बाजारात भाजीपाल्यासह गहू, हरभरा, दादर ज्वारीची आवक सुरळीत सुरू आहे. परंतु किरकोळ बाजार बंद असल्याने बाजार समितीमधील दरांवर परिणाम होत आहे.
बाजार समितीने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरांमधील किरकोळ धान्य विक्री व भाजीपाला विक्रीचे बाजार सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असल्याने बाजार समिती बंद केली जाणार नाही. लिलाव सुरूच राहतील. कोरोनासंबंधी सर्व उपाययोजना बाजार समितीत केल्या आहेत, अशी भूमिका मांडली आहे.
किरकोळ बाजारातील भाजीपाला व धान्य विक्री मागील दोन-तीन दिवसात हळूहळू कमी झाली आहे. तसेच मोठ्या गावांमधील आठवडे बाजारही बंद केले आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरात कमालीची घट झाली आहे.
सोमवारी (ता.२३) जळगाव बाजार समितीमध्ये ११ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली होती. तर तिला दर प्रतिक्विंटल सात हजार रुपयांपर्यंत मिळाले. परंतु मंगळवारी (ता.२४) किरकोळ बाजार बंद झाल्याने बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. लाल कांद्याची सुमारे ५०० क्विंटल आवक झाली.
त्याचे लिलाव सुरळीत झाले. दर कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. धुळे शहर, जळगाव शहर, चोपडा, जामनेर, रावेर, शिरपूर येथील किरकोळ बाजार मंगळवारी बंद ठेवले होते. किरकोळ बाजार बंद असल्याने अनेक ग्राहक सकाळी थेट बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी पोचले होते.
बाजार समितीमध्ये गहू, ज्वारी, हरभऱ्याची आवक सुरळीत आहे. मंगळवारी आवक मात्र काहीशी कमी झाली. गव्हाची सुमारे १०० क्विंटल, ज्वारीची १८० तर हरभऱ्याची ५०० क्विंटल आवक झाली. चोपडा, अमळनेरात आवक कमी होती. तर धुळे येथेही फारशी धान्याची आवक झाली नाही. यामुळे धान्य बाजारातील लिलाव पूर्वीसारखे झाले नाहीत. भाजीपाल्याचे लिलाव सकाळीच झाले. परंतु दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.
परराज्य व परजिल्ह्यातून बटाटा, लसूण, घेवडा, कोबी, वाल यांची मोठी आवक होत असते. परंतु ही आवक मंगळवारी झाली नाही. बटाट्याचे कुठलेही लिलाव जळगाव बाजार समितीमध्ये झाले नसल्याची माहिती मिळाली.
0 comments:
Post a Comment