सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव गुरुवारी (ता.२) सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने आणि गर्दी वाढल्याने पोलिसांनी काहीकाळ लिलाव रोखले. पण नंतर चर्चेने टप्प्याटप्प्याने लिलाव उरकण्यात आले. दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.
कोरोनामुळे सध्या लॅाकडाऊन आहे. पण अत्यावश्यक सेवेमुळे बाजार समितीच्या आवारात सध्या भाजीपाल्याचे लिलाव सुरू आहेत. पण तेही कांदा सेलहॅालमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून सुरू आहेत. पण बाजार समिती प्रशासन फारशी काळजी घेत असल्याचे दिसत नाही. त्यातच किरकोळ विक्रेतेही बाजार समितीच्या आवारातच गर्दी करत असल्याने आता फक्त भाजीपाला उत्पादक शेतकरी, अडत व्यापारी आणि खरेदीदार यांनाच प्रवेश दिला जातो आहे.
किरकोळ विक्रेत्यांची सोय जनावर बाजारावर केली आहे. या कालावधीत कांद्याचे लिलाव मात्र पूर्णपणे बंद करण्यात आले होते. १ एप्रिलपर्यंत हे लिलाव बंद राहणार होते. त्यानंतर २ एप्रिलपासून हे लिलाव सुरू राहणार होते. त्यानुसार आज लिलाव सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने गर्दी वाढलीच, पण लिलावातही अडथळे येऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत हे लिलाव रोखले. पण चर्चेनंतर पुन्हा सोशल डिस्टंसिंग ठेवत लिलाव सुरू राहिले. आज कांद्याला किमान २०० रुपये केला. सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
१४ एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद
बाजार समितीचे संचालक मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतील निर्णयानुसार आठवड्यातून तीन वेळा कांद्याचे लिलाव करण्याचे आधी ठरवण्यात आले होते. पण सध्याच्या लॅाकडाऊनच्या परिस्थितीमुळे धोका अधिकच वाढत असल्याने १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव गुरुवारी (ता.२) सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने आणि गर्दी वाढल्याने पोलिसांनी काहीकाळ लिलाव रोखले. पण नंतर चर्चेने टप्प्याटप्प्याने लिलाव उरकण्यात आले. दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.
कोरोनामुळे सध्या लॅाकडाऊन आहे. पण अत्यावश्यक सेवेमुळे बाजार समितीच्या आवारात सध्या भाजीपाल्याचे लिलाव सुरू आहेत. पण तेही कांदा सेलहॅालमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून सुरू आहेत. पण बाजार समिती प्रशासन फारशी काळजी घेत असल्याचे दिसत नाही. त्यातच किरकोळ विक्रेतेही बाजार समितीच्या आवारातच गर्दी करत असल्याने आता फक्त भाजीपाला उत्पादक शेतकरी, अडत व्यापारी आणि खरेदीदार यांनाच प्रवेश दिला जातो आहे.
किरकोळ विक्रेत्यांची सोय जनावर बाजारावर केली आहे. या कालावधीत कांद्याचे लिलाव मात्र पूर्णपणे बंद करण्यात आले होते. १ एप्रिलपर्यंत हे लिलाव बंद राहणार होते. त्यानंतर २ एप्रिलपासून हे लिलाव सुरू राहणार होते. त्यानुसार आज लिलाव सुरू झाले. पण एकाचवेळी सुमारे ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाल्याने गर्दी वाढलीच, पण लिलावातही अडथळे येऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत हे लिलाव रोखले. पण चर्चेनंतर पुन्हा सोशल डिस्टंसिंग ठेवत लिलाव सुरू राहिले. आज कांद्याला किमान २०० रुपये केला. सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
१४ एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद
बाजार समितीचे संचालक मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतील निर्णयानुसार आठवड्यातून तीन वेळा कांद्याचे लिलाव करण्याचे आधी ठरवण्यात आले होते. पण सध्याच्या लॅाकडाऊनच्या परिस्थितीमुळे धोका अधिकच वाढत असल्याने १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
0 comments:
Post a Comment