नागपूरः देशात द्राक्ष वगळता इतर फळांच्या निर्यातीचा अपेक्षीत उद्देश साध्य झाला नाही. त्यापार्श्वभूमीवर फळ निर्यातीला चालना मिळावी यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या संदर्भात प्राथमिकस्तरावर दोन बैठकाही झाल्याचे सांगण्यात आले.
यासाठी द्राक्ष उत्पादक संघाने पुढाकार घेतला. शेतकरीस्तरावर देखील संशोधन, तंत्रज्ञान सुधार आणि त्याचा अवलंब या बाबींना प्राधान्य देण्यात आले. जागतीकस्तरावरील निर्यातक्षम द्राक्ष वाणांचा शोध घेत त्याची लागवड करण्यात आली. द्राक्ष उत्पादक संघाचे देखील शासनस्तरावरुन बळकटीकरण होऊन देशात द्राक्ष निर्यातीला उभारी मिळाली. या बाबतीत डाळींब, आंबा, सफरचंद आणि त्यातही संत्रा मात्र उपेक्षीतच राहिला. नागपूरी संत्रा चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपतो. परंतू या फळाला राजाश्रय न मिळाल्याने संत्र्यांची निर्यात क्षेत्रातून पिछेहाट झाली.
देशातील फळपिक उत्पादकांना निर्यातीचे बळ मिळावे याकरिता आता केंद्र सरकारचा कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. त्या अंतर्गंत पहिल्या टप्प्यात द्राक्ष, डाळींब, सफरचंद, आंबा तसेच संत्रा या पीकांच्या निर्यातीला चालना दिली जाणार आहे. त्याकरिता निर्यातक्षम फळपिकातील तज्ज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञांचा समावेश असलेली एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापन करण्यात येणार आहे.
अपेडा, अन्न प्रक्रिया विभाग या विभागाचाही या कौन्सीलमध्ये समावेश प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या विषयावर केंद्रीय पातळीवर दोन बैठकाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्या संत्रा निर्यात अवघी 30 टक्के असून ती बांग्लादेशपूरतीच मर्यादीत आहे.
क्लस्टरनिहाय्य होणार लागवड
निर्यातक्षम फळपिकाच्या उत्पादनाकरीता क्लस्टर लागवड व व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता शेतकरी कंपन्यांची मदत घेण्याचे प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले.
नागपूरः देशात द्राक्ष वगळता इतर फळांच्या निर्यातीचा अपेक्षीत उद्देश साध्य झाला नाही. त्यापार्श्वभूमीवर फळ निर्यातीला चालना मिळावी यासाठी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या संदर्भात प्राथमिकस्तरावर दोन बैठकाही झाल्याचे सांगण्यात आले.
यासाठी द्राक्ष उत्पादक संघाने पुढाकार घेतला. शेतकरीस्तरावर देखील संशोधन, तंत्रज्ञान सुधार आणि त्याचा अवलंब या बाबींना प्राधान्य देण्यात आले. जागतीकस्तरावरील निर्यातक्षम द्राक्ष वाणांचा शोध घेत त्याची लागवड करण्यात आली. द्राक्ष उत्पादक संघाचे देखील शासनस्तरावरुन बळकटीकरण होऊन देशात द्राक्ष निर्यातीला उभारी मिळाली. या बाबतीत डाळींब, आंबा, सफरचंद आणि त्यातही संत्रा मात्र उपेक्षीतच राहिला. नागपूरी संत्रा चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपतो. परंतू या फळाला राजाश्रय न मिळाल्याने संत्र्यांची निर्यात क्षेत्रातून पिछेहाट झाली.
देशातील फळपिक उत्पादकांना निर्यातीचे बळ मिळावे याकरिता आता केंद्र सरकारचा कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. त्या अंतर्गंत पहिल्या टप्प्यात द्राक्ष, डाळींब, सफरचंद, आंबा तसेच संत्रा या पीकांच्या निर्यातीला चालना दिली जाणार आहे. त्याकरिता निर्यातक्षम फळपिकातील तज्ज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञांचा समावेश असलेली एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील स्थापन करण्यात येणार आहे.
अपेडा, अन्न प्रक्रिया विभाग या विभागाचाही या कौन्सीलमध्ये समावेश प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या विषयावर केंद्रीय पातळीवर दोन बैठकाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्या संत्रा निर्यात अवघी 30 टक्के असून ती बांग्लादेशपूरतीच मर्यादीत आहे.
क्लस्टरनिहाय्य होणार लागवड
निर्यातक्षम फळपिकाच्या उत्पादनाकरीता क्लस्टर लागवड व व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता शेतकरी कंपन्यांची मदत घेण्याचे प्रस्तावीत असल्याचे सांगण्यात आले.
0 comments:
Post a Comment