Pages - Menu

Tuesday, April 21, 2020

कृषी सल्ला : उन्हाळी भात, काजू, आंबा

काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. 

उन्हाळी भात     

  •  फुलोरा व दाणे भरणे अवस्था    
  • उन्हाळी भात पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने शेतात पाण्याची पातळी ५ सें. मी. पर्यत ठेवावी.

काजू     

  • फळधारणा अवस्था    
  • काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.
  • नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रती कलम १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. कलमांच्या आळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळ्यामध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा पॉलीथीनचे आच्छादन करावे.
  • काजूमध्ये रोठा या किडीचा (खोडकिडीचा) प्रादुर्भाव झाडाचे खोड व उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता  आहे. रोठ्याची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. रोठयाचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी १५ एम. एम. पटाशीच्या सहाय्याने प्रादुर्भित साल काढून झाडातील रोठयाला बाहेर काढून मारुन टाकावे.  क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि. ली. प्रती लिटर या प्रमाणे द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग द्रावणाने चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. 
  • काजू नवीन लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये स्वच्छता करून घ्यावी.

आंबा

  • फळधारणा अवस्था
  • आर्द्रतेत होणारी घट व तापमानात होणाऱ्या वाढीमुळे  काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह काढणी करावी. ही काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर काढणी करावी. 
  • उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. 
  • आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. 
  •  फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. 
  • फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे.
  • आंब्यावरील काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेचच फळे ५२ अंश सेल्सिअस  तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. 
  •  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरुगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत.   
  • ढगाळ वातावरण असल्यामुळे आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक  मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळे प्रती हेक्टरी चार या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर टांगून ठेवावेत. फळमाशीच्या सापळ्यात ठेवलेले रासायनिक खाद्य आमिष (मिथाईल युजेनॉल) ६ ते ७ आठवड्यानंतर बदलावे. 
  • फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावी. बागेत स्वच्छता ठेवावी.
  • तापमान आणि आर्द्रतेत होणाऱ्या बदलामुळे फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये अंडाकृती अवस्थेत असलेल्या फळांची गळ होण्याची शक्यता आहे. ही फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.  
  • नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवडयातून दोन वेळा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोन वेळा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोन वेळा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी.

-०२३५८- २८२३८७

(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)
 

 

News Item ID: 
820-news_story-1587471424-622
Mobile Device Headline: 
कृषी सल्ला : उन्हाळी भात, काजू, आंबा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. 

उन्हाळी भात     

  •  फुलोरा व दाणे भरणे अवस्था    
  • उन्हाळी भात पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने शेतात पाण्याची पातळी ५ सें. मी. पर्यत ठेवावी.

काजू     

  • फळधारणा अवस्था    
  • काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.
  • नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना दर आठ दिवसांनी प्रती कलम १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. कलमांच्या आळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यासाठी आळ्यामध्ये वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा पॉलीथीनचे आच्छादन करावे.
  • काजूमध्ये रोठा या किडीचा (खोडकिडीचा) प्रादुर्भाव झाडाचे खोड व उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता  आहे. रोठ्याची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. रोठयाचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी १५ एम. एम. पटाशीच्या सहाय्याने प्रादुर्भित साल काढून झाडातील रोठयाला बाहेर काढून मारुन टाकावे.  क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि. ली. प्रती लिटर या प्रमाणे द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग द्रावणाने चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. 
  • काजू नवीन लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये स्वच्छता करून घ्यावी.

आंबा

  • फळधारणा अवस्था
  • आर्द्रतेत होणारी घट व तापमानात होणाऱ्या वाढीमुळे  काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह काढणी करावी. ही काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर काढणी करावी. 
  • उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. 
  • आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. 
  •  फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. 
  • फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देण्याचे बंद करावे.
  • आंब्यावरील काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेचच फळे ५२ अंश सेल्सिअस  तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. 
  •  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरुगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत.   
  • ढगाळ वातावरण असल्यामुळे आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (१२ टक्के) अधिक  मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळे प्रती हेक्टरी चार या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर टांगून ठेवावेत. फळमाशीच्या सापळ्यात ठेवलेले रासायनिक खाद्य आमिष (मिथाईल युजेनॉल) ६ ते ७ आठवड्यानंतर बदलावे. 
  • फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावी. बागेत स्वच्छता ठेवावी.
  • तापमान आणि आर्द्रतेत होणाऱ्या बदलामुळे फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये अंडाकृती अवस्थेत असलेल्या फळांची गळ होण्याची शक्यता आहे. ही फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.  
  • नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवडयातून दोन वेळा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोन वेळा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोन वेळा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी.

-०२३५८- २८२३८७

(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)
 

 

English Headline: 
Agriculture Agricultural News Marathi article regarding management of crops.
Author Type: 
External Author
कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी
Search Functional Tags: 
भात पीक, कोकण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding management of crops.
Meta Description: 
काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. 


No comments:

Post a Comment