Tuesday, April 21, 2020

रत्नागिरी बाजार समितीत उद्यापासून आंबा खरेदी-विक्री

रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुरू करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिल्या आहेत. पणनच्या मदतीने २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात याची सुरुवात होणार आहे. 

राज्यात ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा खुल्या बाजारात विक्री करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. या बाबीचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांचा आंबा खरेदी- विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे. याचा विचार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी पणन मंडळ आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त सभा २० एप्रिलला झाली. 

आंबा हे राष्ट्रीय फळ असून कोकणातील आंब्याला जीआय मानांकन प्राप्त आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी या सभेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले आहे. आंबा घेऊन येताना त्याची प्रत गुणवत्ता चांगली असावी म्हणजेच फळाचे वजन १८० ग्रॅम पेक्षा जास्त असावे व डाग विरहीत असावा. 

आंबा खरेदी-विक्री २३ एप्रिलपासून दररोज दुपारी तीन वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात होणार आहे. आंबा बागायतदारांनी अधिक माहितीसाठी am_ratnagiri@msamb.com या ई-मेल वर अथवा किरण महाजन ९४२२६३६८३०, संजय आयरे ७३८७६०६५६५ यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिंबधक डॉ. गार्डी यांनी आवाहन केले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1587475058-867
Mobile Device Headline: 
रत्नागिरी बाजार समितीत उद्यापासून आंबा खरेदी-विक्री
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुरू करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिल्या आहेत. पणनच्या मदतीने २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात याची सुरुवात होणार आहे. 

राज्यात ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा खुल्या बाजारात विक्री करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. या बाबीचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांचा आंबा खरेदी- विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे. याचा विचार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी पणन मंडळ आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त सभा २० एप्रिलला झाली. 

आंबा हे राष्ट्रीय फळ असून कोकणातील आंब्याला जीआय मानांकन प्राप्त आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी या सभेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले आहे. आंबा घेऊन येताना त्याची प्रत गुणवत्ता चांगली असावी म्हणजेच फळाचे वजन १८० ग्रॅम पेक्षा जास्त असावे व डाग विरहीत असावा. 

आंबा खरेदी-विक्री २३ एप्रिलपासून दररोज दुपारी तीन वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात होणार आहे. आंबा बागायतदारांनी अधिक माहितीसाठी am_ratnagiri@msamb.com या ई-मेल वर अथवा किरण महाजन ९४२२६३६८३०, संजय आयरे ७३८७६०६५६५ यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिंबधक डॉ. गार्डी यांनी आवाहन केले आहे. 

English Headline: 
Agriculture news in marathi Mango purchase and sale in Ratnagiri market committee from tomorrow
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, महाराष्ट्र, Maharashtra, कृषी पणन, Marketing, कोकण, Konkan, ई-मेल
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Mango purchase and sale in Ratnagiri market committee from tomorrow
Meta Description: 
Mango purchase and sale in Ratnagiri market committee from tomorrow रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुरू करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिल्या आहेत. पणनच्या मदतीने २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात याची सुरुवात होणार आहे. 


0 comments:

Post a Comment