Thursday, August 6, 2020

आले पिकासाठी सुधारित अवजारे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.

आले आणि हळद लागवडीपासून विविध मशागतीची कामे केली जातात. अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पांतर्गत हळद, आले लागवड ते उत्पादनापर्यंतचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे निदर्शनास आले की, बहुतांश पीक व्यवस्थापनाची कामे ही महिला करतात. ही कामे करण्यासाठी महिला अजुनही सुधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाहीत. हे लक्षात घेऊन महिलांचे श्रम कमी होण्यासाठी प्रकल्पांतर्गत विविध अवजारे विकसित करण्यात आली आहेत.विद्यापीठाच्या प्रकल्पांतर्गत हळद  आणि आले पिकासाठी विविध लहान अवजारे तयार करण्यात आली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी झाले. वेळेवर काम करणे सुलभ झाले आहे. 

काडी-कचरा वेचण्यासाठी दाताळे 

  • मे ते जून या काळात शेतातील काडी,कचरा गोळा केला जातो. हे काम महिलांना करावे लागते. 
  • हाताने काडी,कचरा वेचण्यासाठी महिलांना वाकून काम करावे लागते. त्यामुळे हातांना जखमा होतात. वाकल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो. 
  • महिलांचा शेतातील काडीकचरा गोळा करण्याचा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले दाताळे वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे शारीरिक श्रम कमी होतात. वेळेची बचत होते.

कंद लागवडीसाठी उकरी आणि नखाळ्या 

  • काडी कचरा वेचल्यानंतर जमीन लागवडीसाठी तयार केली जाते. लागवडीसाठी सरी किंवा गादी वाफे तयार केले जातात.
  • कंद लावताना महिलांना दोन पायांवर बसून हाताच्या बोटांनी किंवा खुरप्याच्या साहाय्याने माती उकरून कंद लावावा लागतो. त्यामुळे बोटांना जखमा होतात, खुरप्याने माती उकरताना वेळ जास्त लागतो.
  • माती उकरून हळद आणि आले कंद लागवड करण्यासाठी उकरी आणि नखाळ्या ही छोटी अवजारे तयार करण्यात आली आहेत. उकरीमुळे माती उकरण्यास कमी वेळ लागतो. आले  कंद लागवडीचे काम  नेहमीच्या पद्धतीपेक्षा (३३ टक्के) लवकर होते.  
  • नखाळ्यांचा संच पाच बोटांमध्ये घालून जर माती उकरण्याचे काम केले तर पारंपरिक पद्धतीपेक्षा आले कंद लागवडीचे काम (१६ टक्के) जास्त गतीने होते. हाताच्या बोटांना जखमा होत नाहीत. या अवजारांच्या वापरामुळे श्रमामध्ये बचत होऊन थकवा जाणवत नाही. 

 

तण काढण्यासाठी नवीन खुरपे

  • पिकामध्ये बहुतांश निंदणीची कामे महिला करतात. 
  • पारंपरिक पद्धतीने खुरप्याने तण काढले जाते. या पद्धतीमुळे महिलांना शारीरिक थकवा जाणवतो. श्रम जास्त लागतात. तण काढणे काहीवेळा अवघड जाते. वेळ जास्त लागतो. 
  •  निंदणीचे श्रम कमी करण्यासाठी विद्यापिठाने सुधारित खुरपे विकसित केले आहे. या खुरप्यामुळे तण काढणे सोपे जाते. वेळ कमी लागतो. शारीरिक कष्ट कमी होतात. पारंपरिक खुरप्यापेक्षा ५ टक्के काम अधिक होते.

रोपांना माती लावण्यासाठी सावडी 

  • रोपांना माती लावताना पुरुष मंडळी खोरे वापरतात. हे खोरे वजनाने जड असल्यामुळे महिलांना त्यांचा वापर करणे अवघड जाते. महिला रोपांना मातीची भर देण्यासाठी  जुन्या पाइपचा तुकडा, जुना पत्रा वापरतात. 
  •  मातीची भर देण्यासाठी पाईप तुकडा किंवा पत्रा वापरल्याने  महिलांच्या हाताला इजा होते.  हे लक्षात घेऊन विद्यापीठाने सावडी तयार केली आहे. 
  • सावडीला वरच्या बाजूस लाकडी मूठ आहे. याच्या वापराने महिलांच्या हाताला जखमा होत नाहीत. मातीची भर देण्याची गती (२१ टक्के) वाढते. 
  • माती लावण्याचे श्रम कमी झाल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही.

कंद स्वच्छतेसाठी हातमोजे

  • आले काढणी करताना नांगराचा वापर केला जातो. यामुळे आल्याचे कंद उघडे पडतात. 
  • तयार आल्याचे कंद जमिनीच्या बाहेर आल्यावर महिला हे गड्डे हाताने माती फोडून वेगळे करतात. हे काम महिला हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात. यामुळे बोटे आणि कातडीला जखमा होतात. 
  • पारंपरिक पद्धतीमध्ये महिला आल्याच्या गड्याची माती काढताना लोकरीचे मोजे वापरतात. पण हे मोजे एका दिवसात फाटून जातात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने विशिष्ट हातमोजे तयार केले आहेत. 
  • सुधारित हातमोजामुळे बोटांना इजा होत नाही. गड्डा स्वच्छ करण्याच्या कामाची गती वाढते. शारीरिक थकवा कमी होते. 

 

- डॉ. जयश्री रोडगे, ९५९४००५८४०

(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन,गृह विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

 

 

News Item ID: 
820-news_story-1596537056-140
Mobile Device Headline: 
आले पिकासाठी सुधारित अवजारे
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.

आले आणि हळद लागवडीपासून विविध मशागतीची कामे केली जातात. अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पांतर्गत हळद, आले लागवड ते उत्पादनापर्यंतचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे निदर्शनास आले की, बहुतांश पीक व्यवस्थापनाची कामे ही महिला करतात. ही कामे करण्यासाठी महिला अजुनही सुधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाहीत. हे लक्षात घेऊन महिलांचे श्रम कमी होण्यासाठी प्रकल्पांतर्गत विविध अवजारे विकसित करण्यात आली आहेत.विद्यापीठाच्या प्रकल्पांतर्गत हळद  आणि आले पिकासाठी विविध लहान अवजारे तयार करण्यात आली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी झाले. वेळेवर काम करणे सुलभ झाले आहे. 

काडी-कचरा वेचण्यासाठी दाताळे 

  • मे ते जून या काळात शेतातील काडी,कचरा गोळा केला जातो. हे काम महिलांना करावे लागते. 
  • हाताने काडी,कचरा वेचण्यासाठी महिलांना वाकून काम करावे लागते. त्यामुळे हातांना जखमा होतात. वाकल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो. 
  • महिलांचा शेतातील काडीकचरा गोळा करण्याचा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले दाताळे वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे शारीरिक श्रम कमी होतात. वेळेची बचत होते.

कंद लागवडीसाठी उकरी आणि नखाळ्या 

  • काडी कचरा वेचल्यानंतर जमीन लागवडीसाठी तयार केली जाते. लागवडीसाठी सरी किंवा गादी वाफे तयार केले जातात.
  • कंद लावताना महिलांना दोन पायांवर बसून हाताच्या बोटांनी किंवा खुरप्याच्या साहाय्याने माती उकरून कंद लावावा लागतो. त्यामुळे बोटांना जखमा होतात, खुरप्याने माती उकरताना वेळ जास्त लागतो.
  • माती उकरून हळद आणि आले कंद लागवड करण्यासाठी उकरी आणि नखाळ्या ही छोटी अवजारे तयार करण्यात आली आहेत. उकरीमुळे माती उकरण्यास कमी वेळ लागतो. आले  कंद लागवडीचे काम  नेहमीच्या पद्धतीपेक्षा (३३ टक्के) लवकर होते.  
  • नखाळ्यांचा संच पाच बोटांमध्ये घालून जर माती उकरण्याचे काम केले तर पारंपरिक पद्धतीपेक्षा आले कंद लागवडीचे काम (१६ टक्के) जास्त गतीने होते. हाताच्या बोटांना जखमा होत नाहीत. या अवजारांच्या वापरामुळे श्रमामध्ये बचत होऊन थकवा जाणवत नाही. 

 

तण काढण्यासाठी नवीन खुरपे

  • पिकामध्ये बहुतांश निंदणीची कामे महिला करतात. 
  • पारंपरिक पद्धतीने खुरप्याने तण काढले जाते. या पद्धतीमुळे महिलांना शारीरिक थकवा जाणवतो. श्रम जास्त लागतात. तण काढणे काहीवेळा अवघड जाते. वेळ जास्त लागतो. 
  •  निंदणीचे श्रम कमी करण्यासाठी विद्यापिठाने सुधारित खुरपे विकसित केले आहे. या खुरप्यामुळे तण काढणे सोपे जाते. वेळ कमी लागतो. शारीरिक कष्ट कमी होतात. पारंपरिक खुरप्यापेक्षा ५ टक्के काम अधिक होते.

रोपांना माती लावण्यासाठी सावडी 

  • रोपांना माती लावताना पुरुष मंडळी खोरे वापरतात. हे खोरे वजनाने जड असल्यामुळे महिलांना त्यांचा वापर करणे अवघड जाते. महिला रोपांना मातीची भर देण्यासाठी  जुन्या पाइपचा तुकडा, जुना पत्रा वापरतात. 
  •  मातीची भर देण्यासाठी पाईप तुकडा किंवा पत्रा वापरल्याने  महिलांच्या हाताला इजा होते.  हे लक्षात घेऊन विद्यापीठाने सावडी तयार केली आहे. 
  • सावडीला वरच्या बाजूस लाकडी मूठ आहे. याच्या वापराने महिलांच्या हाताला जखमा होत नाहीत. मातीची भर देण्याची गती (२१ टक्के) वाढते. 
  • माती लावण्याचे श्रम कमी झाल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही.

कंद स्वच्छतेसाठी हातमोजे

  • आले काढणी करताना नांगराचा वापर केला जातो. यामुळे आल्याचे कंद उघडे पडतात. 
  • तयार आल्याचे कंद जमिनीच्या बाहेर आल्यावर महिला हे गड्डे हाताने माती फोडून वेगळे करतात. हे काम महिला हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात. यामुळे बोटे आणि कातडीला जखमा होतात. 
  • पारंपरिक पद्धतीमध्ये महिला आल्याच्या गड्याची माती काढताना लोकरीचे मोजे वापरतात. पण हे मोजे एका दिवसात फाटून जातात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने विशिष्ट हातमोजे तयार केले आहेत. 
  • सुधारित हातमोजामुळे बोटांना इजा होत नाही. गड्डा स्वच्छ करण्याच्या कामाची गती वाढते. शारीरिक थकवा कमी होते. 

 

- डॉ. जयश्री रोडगे, ९५९४००५८४०

(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन,गृह विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

 

 

English Headline: 
Agriculture Agricultural News Marathi article regarding implements use in Ginger management.
Author Type: 
External Author
डॉ. जयश्री रोडगे, सौ. मंजुषा रेवणवार
Search Functional Tags: 
equipments, महिला, आले लागवड, Ginger Cultivation
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding implements use in Ginger management.
Meta Description: 
article regarding implements use in Ginger management. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.


0 comments:

Post a Comment