सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणात बरेच बदल दिसत आहेत. सध्या दिवसाचे तापमान वाढत असून, रात्रीचे तापमान बऱ्यापैकी कमी होताना दिसून येत आहे. अशातच बागेत आर्द्रतेचे प्रमाणही तितक्याच प्रमाणात कमी होताना दिसून येईल. किमान आणि कमाल तापमानात होत असलेली ही तफावत द्राक्ष बागेत घडाच्या विकासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वातावरणात येणाऱ्या अडचणींवर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील.
द्राक्ष घडाचा सुकवा
- दिवसाच्या तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे घडाच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो. वाढत्या तापमानामुळे बागेत बाष्पीभवनाद्वारे पानांतून निघून गेलेले पाणी हे वेलीची पाण्याची गरज पुन्हा वाढवते. या वेळी फक्त पाणीच नाही तर अन्नद्रव्यांची गरजही तितक्याच प्रमाणात वाढते.
- बागेसाठी ठरविलेले खत आणि पाण्याचे वेळापत्रक व्यवस्थितरीत्या सुरू असले तरी अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे वेलीची पाणी व अन्नद्रव्यांची गरज आणि उपलब्धता यामध्ये बरीच तफावत दिसून येते. यामुळे अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते. विशेष म्हणजे कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमच्या उपलब्धतेमध्ये यावेळी अडचणी येतात. घडाचा आकार वाढतेवेळी नेमके मण्यात पाणी उतरतेवेळी ही समस्या दिसून येते. या वेळी बागेत फवारणीद्वारे अन्नद्रव्ये उपलब्ध करून फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्याकरिता तापमानातील बदल पाहूनच पाण्याची पूर्तता करणे गरजेचे असेल. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास अन्नपुरवठाही तितक्याच प्रमाणात होईल.
मण्याचा आकार कमी असणे
- बदलत्या तापमानामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावताना दिसून येईल. या वेळी रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे मण्याच्या विकासात अडचणी येताना दिसून येईल. उशीर छाटणी झालेल्या बागेत मणी सेटिंग झाल्यानंतरची अवस्था असल्यास, संजीवकांच्या वापराचा चांगला फायदा होऊ शकेल. या वेळी जिबरेलिक ॲसिड (जीए-३) २० ते २५ पीपीएम, सिक्स बीए (१० पीपीएम) इत्यादी संजीवकांचा वापर करता येतो.
- परंतु जर मण्यांचा आकार ८ ते १० मिलिमीटर पेक्षा जास्त वाढल्यास, फारसा फरक पडणार नाही. या वेळी संजीवकांचा वापर करणेही चुकीचे असेल. अशा परिस्थितीत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
उपाययोजना
मुळी कार्यरत ठेवणे
या वेळी बागेत पांढरी मुळी जितक्या जास्त काळ टिकून राहील तितका मण्याचा विकास होण्यास फायदा होईल. बऱ्याच वेळा थंडीत मुळी कार्य करत नसल्याचे बोलले जाते. परंतु या वेळी जर मुळी कार्यक्षम नसेल तर मात्र अडचणी येऊ शकतील. याकरिता बोदाच्या दोन्ही बाजूंनी नांगराने हलकी चारी घेतल्यास थोड्याफार प्रमाणात मुळी तुटेल. तसेच बोदावर ठिबकचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्याच्या २५ ते ३० सेंमी बाजूला कुदळाने किंवा खुरप्याने खोदून घ्यावे. यामुळे देखील काही प्रमाणात मुळी तुटेल. यामुळे नवीन पांढरी अशी कार्यक्षम मुळी तयार करण्यास मदत होईल. ही मुळी उपलब्ध असलेले पाणी व अन्नद्रव्य सहजरीत्या उचलून घडाच्या विकासात मदत करेल.
पाण्याचा योग्य वापर
ज्या वेळी बागेतील तापमान फारच कमी होते, अशावेळी वेलीच्या शरीरशास्रीय हालचालीचा वेग मंदावतो. याचा परिणाम घडाच्या विकासावर होतो. अशा परिस्थितीत, बागेत पाण्याचे प्रमाण वाढवल्यास, रात्रीच्या तापमानात वाढ करून घेता येईल. परिणामी, वेलीच्या विकासात अडचणी येणार नाहीत.
खतांचा योग्य वापर
- घडाच्या विकासात खतांचा योग्य वापर महत्त्वाचा असतो. मणी सेटिंग ते घडामध्ये पाणी उतरेपर्यंत घडाचा विकास जलद गतीने होतो. या वेळी खत व्यवस्थापन चांगले असले तर अपेक्षित आकाराचे मणी सहजरित्या मिळतात. या वेळी स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फेरस यांसारखी अन्नद्रव्ये महत्त्वाची असतात. बऱ्याचदा बागायतदार स्फुरद आणि पालाश उपलब्ध असलेल्या ग्रेडमधून सुरुवातीस उपलब्धता करतात. त्यामुळे काडीची परिपक्वता लवकर येते. त्याचसोबत मण्याचा आकार कमी राहून मण्यात गोडी यायला सुरुवात होते. परिणामी, मण्याचा आकार व वजन मिळत नाही.
- मणी सेंटिंगपासून ते १२ ते १४ मिमी आकाराच्या मण्याच्या अवस्थेत नत्र आणि स्फुरद (उदा.१२ः६१ः०, १८ः४६ः० इ.) वापर फायद्याचा राहील. तर त्यापुढील वाढीच्या अवस्थेत स्फुरदयुक्त खते (उदा. ०ः९ः४६, ०ः४०ः३७, ०ः५२ः३४ इ.) वापर फायदेशीर ठरेल.
बागेत रिकटचे व्यवस्थापन
- सध्या बागेतील तापमानात वाढ होताना दिसून येते. परंतु किमान तापमान अजूनही वाढलेले दिसत नाही. मागील हंगामात कलम केलेल्या द्राक्ष बागेत रिकट घेण्याची वेळ साधारणतः १० फेब्रुवारीनंतर येईल. त्यापूर्वी बागेतील व्यवस्थापन महत्त्वाचे असेल.
- दोन वेलींच्या कलम काडीमध्ये ९ ते १० इंच जागा सोडून ३ ते ४ इंच खोल व २ फूट रुंद अशी चारी घ्यावी. त्यामध्ये कुजलेले शेणखत ४ ते ५ ट्रॉली, सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो, फेरस सल्फेट १५ ते २० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १० ते १५ किलो प्रति एकर प्रमाणे शेणखतात मिसळून त्यावर मातीचा हलका थर देऊन झाकून घेतल्यास नवीन बोद तयार होईल. यामध्ये हवा खेळती राहिल्यास, पांढरी अशी नवीन कार्यक्षम मुळी तयार होईल. आणि मुळीचा विकास होऊन रिकटनंतर वेलीच्या वाढीवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
- रिकट होण्यापूर्वी बागेतील पानगळ करणे गरजेचे असेल. या वेळी बागेत वेलीची पूर्ण पानगळ न करता फक्त कलम जोडापासून १ फूट अंतरावर केलेली पानगळ पुरेशी होईल, याकरिता एकतर हाताने पानगळ करावी.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२० ३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणात बरेच बदल दिसत आहेत. सध्या दिवसाचे तापमान वाढत असून, रात्रीचे तापमान बऱ्यापैकी कमी होताना दिसून येत आहे. अशातच बागेत आर्द्रतेचे प्रमाणही तितक्याच प्रमाणात कमी होताना दिसून येईल. किमान आणि कमाल तापमानात होत असलेली ही तफावत द्राक्ष बागेत घडाच्या विकासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वातावरणात येणाऱ्या अडचणींवर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील.
द्राक्ष घडाचा सुकवा
- दिवसाच्या तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे घडाच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो. वाढत्या तापमानामुळे बागेत बाष्पीभवनाद्वारे पानांतून निघून गेलेले पाणी हे वेलीची पाण्याची गरज पुन्हा वाढवते. या वेळी फक्त पाणीच नाही तर अन्नद्रव्यांची गरजही तितक्याच प्रमाणात वाढते.
- बागेसाठी ठरविलेले खत आणि पाण्याचे वेळापत्रक व्यवस्थितरीत्या सुरू असले तरी अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे वेलीची पाणी व अन्नद्रव्यांची गरज आणि उपलब्धता यामध्ये बरीच तफावत दिसून येते. यामुळे अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते. विशेष म्हणजे कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमच्या उपलब्धतेमध्ये यावेळी अडचणी येतात. घडाचा आकार वाढतेवेळी नेमके मण्यात पाणी उतरतेवेळी ही समस्या दिसून येते. या वेळी बागेत फवारणीद्वारे अन्नद्रव्ये उपलब्ध करून फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्याकरिता तापमानातील बदल पाहूनच पाण्याची पूर्तता करणे गरजेचे असेल. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास अन्नपुरवठाही तितक्याच प्रमाणात होईल.
मण्याचा आकार कमी असणे
- बदलत्या तापमानामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावताना दिसून येईल. या वेळी रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे मण्याच्या विकासात अडचणी येताना दिसून येईल. उशीर छाटणी झालेल्या बागेत मणी सेटिंग झाल्यानंतरची अवस्था असल्यास, संजीवकांच्या वापराचा चांगला फायदा होऊ शकेल. या वेळी जिबरेलिक ॲसिड (जीए-३) २० ते २५ पीपीएम, सिक्स बीए (१० पीपीएम) इत्यादी संजीवकांचा वापर करता येतो.
- परंतु जर मण्यांचा आकार ८ ते १० मिलिमीटर पेक्षा जास्त वाढल्यास, फारसा फरक पडणार नाही. या वेळी संजीवकांचा वापर करणेही चुकीचे असेल. अशा परिस्थितीत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
उपाययोजना
मुळी कार्यरत ठेवणे
या वेळी बागेत पांढरी मुळी जितक्या जास्त काळ टिकून राहील तितका मण्याचा विकास होण्यास फायदा होईल. बऱ्याच वेळा थंडीत मुळी कार्य करत नसल्याचे बोलले जाते. परंतु या वेळी जर मुळी कार्यक्षम नसेल तर मात्र अडचणी येऊ शकतील. याकरिता बोदाच्या दोन्ही बाजूंनी नांगराने हलकी चारी घेतल्यास थोड्याफार प्रमाणात मुळी तुटेल. तसेच बोदावर ठिबकचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्याच्या २५ ते ३० सेंमी बाजूला कुदळाने किंवा खुरप्याने खोदून घ्यावे. यामुळे देखील काही प्रमाणात मुळी तुटेल. यामुळे नवीन पांढरी अशी कार्यक्षम मुळी तयार करण्यास मदत होईल. ही मुळी उपलब्ध असलेले पाणी व अन्नद्रव्य सहजरीत्या उचलून घडाच्या विकासात मदत करेल.
पाण्याचा योग्य वापर
ज्या वेळी बागेतील तापमान फारच कमी होते, अशावेळी वेलीच्या शरीरशास्रीय हालचालीचा वेग मंदावतो. याचा परिणाम घडाच्या विकासावर होतो. अशा परिस्थितीत, बागेत पाण्याचे प्रमाण वाढवल्यास, रात्रीच्या तापमानात वाढ करून घेता येईल. परिणामी, वेलीच्या विकासात अडचणी येणार नाहीत.
खतांचा योग्य वापर
- घडाच्या विकासात खतांचा योग्य वापर महत्त्वाचा असतो. मणी सेटिंग ते घडामध्ये पाणी उतरेपर्यंत घडाचा विकास जलद गतीने होतो. या वेळी खत व्यवस्थापन चांगले असले तर अपेक्षित आकाराचे मणी सहजरित्या मिळतात. या वेळी स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फेरस यांसारखी अन्नद्रव्ये महत्त्वाची असतात. बऱ्याचदा बागायतदार स्फुरद आणि पालाश उपलब्ध असलेल्या ग्रेडमधून सुरुवातीस उपलब्धता करतात. त्यामुळे काडीची परिपक्वता लवकर येते. त्याचसोबत मण्याचा आकार कमी राहून मण्यात गोडी यायला सुरुवात होते. परिणामी, मण्याचा आकार व वजन मिळत नाही.
- मणी सेंटिंगपासून ते १२ ते १४ मिमी आकाराच्या मण्याच्या अवस्थेत नत्र आणि स्फुरद (उदा.१२ः६१ः०, १८ः४६ः० इ.) वापर फायद्याचा राहील. तर त्यापुढील वाढीच्या अवस्थेत स्फुरदयुक्त खते (उदा. ०ः९ः४६, ०ः४०ः३७, ०ः५२ः३४ इ.) वापर फायदेशीर ठरेल.
बागेत रिकटचे व्यवस्थापन
- सध्या बागेतील तापमानात वाढ होताना दिसून येते. परंतु किमान तापमान अजूनही वाढलेले दिसत नाही. मागील हंगामात कलम केलेल्या द्राक्ष बागेत रिकट घेण्याची वेळ साधारणतः १० फेब्रुवारीनंतर येईल. त्यापूर्वी बागेतील व्यवस्थापन महत्त्वाचे असेल.
- दोन वेलींच्या कलम काडीमध्ये ९ ते १० इंच जागा सोडून ३ ते ४ इंच खोल व २ फूट रुंद अशी चारी घ्यावी. त्यामध्ये कुजलेले शेणखत ४ ते ५ ट्रॉली, सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो, फेरस सल्फेट १५ ते २० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १० ते १५ किलो प्रति एकर प्रमाणे शेणखतात मिसळून त्यावर मातीचा हलका थर देऊन झाकून घेतल्यास नवीन बोद तयार होईल. यामध्ये हवा खेळती राहिल्यास, पांढरी अशी नवीन कार्यक्षम मुळी तयार होईल. आणि मुळीचा विकास होऊन रिकटनंतर वेलीच्या वाढीवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
- रिकट होण्यापूर्वी बागेतील पानगळ करणे गरजेचे असेल. या वेळी बागेत वेलीची पूर्ण पानगळ न करता फक्त कलम जोडापासून १ फूट अंतरावर केलेली पानगळ पुरेशी होईल, याकरिता एकतर हाताने पानगळ करावी.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२० ३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
0 comments:
Post a Comment