1. आज ७ तारखेला पालघर, ठाणे, पुणे, आणि नगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) कायम ठेवलीय. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाबरोबर विजांचा कडकडाट (thunderstorms and lightning) आणि ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे. उद्या ८ तारखेला पावसाची व्याप्ती वाढून तो कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पसरण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त असल्याचं मुंबई वेधशाळेच्या माहितीवरून स्पष्ट होतंय.
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds &light to moderate spells of rain very likely at isolated places in the districts of Dhule, Nasik, Nandurbar, Jalgaon , Pune, Ahmednagar,Aurangabad and Thane during next 3-4 hours. pic.twitter.com/e6n7u2U02H
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 7, 2022
2. रशिया - युक्रेन युद्धामुळे (RussiaUkraineWar) युक्रेनमधून आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलाच्या (sunflower oil) पुरवठ्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पुरवठा वाढवण्यावर सरकारनं भर द्यावा, असा सल्ला सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (sopa) दिलाय. त्याच बरोबर खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्याची मागणीही सोपानं केंद्राशी केलेल्या पत्रव्यवहारातून केलीय. चालू युद्धामुळे देशात दोन लाख टन खाद्यतेलाचा तुटवडा भासेल, असा सोपाचा अंदाज आहे.
हे देखील वाचा : भारत यावर्षी विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात करण्याच्या तयारीत
3. आज लातूर बाजारात लाल तुरीची (pigeon pea) २९८३ क्विंटल आवक झालीय. आवक मालाला कमीत कमी ६०६० रुपये क्विंटलचा भाव मिळाला असून जास्तीत जास्त भाव ६६७५ रुपयांचा भाव मिळालाय. तसंच सर्वसाधारण भाव ६४०० रुपयांचे होते. दुसरीकडे नागपूर बाजारात लाल तुरीची आवक ३४५६ क्विंटलची राहिली. या मालाचे भाव ६००० ते ६५२१ रुपयांच्या घरात होते. तर सर्वसाधारण भाव ६३९१ रुपये होता. गेल्या आठवड्यात तूर किमान आधारभूत किमतीच्या (MSP) आसपास आली होती. राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये तुरीचे सर्वसाधारण भाव ६१०० ते ६३०० रुपयांच्या दरम्यान राहिल्याचं गेल्या आठवड्यात दिसलं. तर काही ठिकाणी मालाला ६७०० रुपये क्विंटलचा दरही मिळाला होता.
हे देखील वाचा : हमीभावाने तूर खेरदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद
4. नोमुरा या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार केंद्र सरकारनं खाद्यतेलाचे पर्यायी स्रोत शोधायला सुरुवात केलीय. खतांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असल्याचं नोमुरानं म्हटलंय. सध्याच्या युद्धस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असल्याचंही नोमुरानं म्हटलंय. संस्थेच्या म्हणण्यानुसार भारताचा रशिया, युक्रेन, आणि बेलारुस यांच्याशी थेट व्यापार कमी असला तरी खाद्यतेल आणि खतांच्या पुरवठ्याच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. या तीन देशांची मिळून सुमारे साडे अकरा टक्क्यांची खाद्यतेल (edible oils) निर्यात आणि ११ टक्के खत निर्यात (fertilizers) एकट्या भारताला होत असते. तर रशिया आणि युक्रेनचा विचार करता भारताला लागणाऱ्या एकूण सूर्यफूल आयातीपैकी ९० टक्के आयात ही याच देशांमधून होत असते. तर दुसरीकडे भारत रशियाकडून १७ टक्के एमओपी आणि ६० टक्के नत्र, स्फुरद, आणि पालाश खतांची आयात करत असतो, अशी माहितीही या अहवालात दिलीय.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. गेल्या आठवड्यात राज्यातल्या प्रमुख बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक वाढल्याचं दिसलं. लातूर, जालना, अकोला, वाशीम, आणि अमरावती जिल्ह्यांमधल्या बाजार समित्या पाहिल्यास तिथं आवकेचं प्रमाण जास्त राहिल्याचं दिसतं. याशिवाय खामगाव, धर्माबाद, अंमळनेर, चोपडा, आणि शहादा बाजारातही टप्प्याटप्प्यानं आवक झाल्याचं दिसतं. तर हंगाम सुरू होताच यातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये भावपातळी दबावात आली आहे. लातूर बाजारात गेल्या आठवडाभरात ७८७६४ क्विंटल हरभरा आवक झाला. या कालावधीत सर्वसाधारण भावपातळी ४६५० ते ४९०० रुपयांच्या दरम्यान राहिली. पुणे, मुंबई, आणि लातूर वगळता राज्यात इतर कुठंही आवक मालाला किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळाल्याचं दिसलं नाही. पुणे, मुंबई, आणि लातूर इथंही अपवादात्मक परिस्थितीत नगण्य प्रमाणातल्या मालाला चांगला भाव मिळालाय. यंदा हरभऱ्याला ५२३० रुपयांची किमान आधारभूत किंमत किंवा एमएसपी जाहीर करण्यात आलीय. तर विदर्भातल्या अकोला बाजारात १४३८३ क्विंटल हरभरा विकायला आला होता. या मालाचे सर्वसाधारण दर कमीत कमी ४४०० तर जास्तीत जास्त ४६५० रुपये होते. पोषक हवामान, वाढलेला पेरा, आणि चांगला बियाणे पुरवठा यामुळे यंदा देशात हरभऱ्याचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. २०२१ मध्ये हरभऱ्याचे बाजारभाव हे एमएसपीच्या आसपास किंवा बहुतांश वेळा कमी होते. २०२२ मध्ये संपूर्ण वर्षभरात सध्याच्या पिकाचं आकारमान पाहता, आधारभाव खरेदीतला सरकारी वाटा वाढण्याची गरज असून तसं झालं तरच २०२२ मध्ये एमएसपीच्या आसपास आपण बाजारभावाची अपेक्षा करू शकतो, असं जाणकारांचं मत आहे.
1. आज ७ तारखेला पालघर, ठाणे, पुणे, आणि नगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) कायम ठेवलीय. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाबरोबर विजांचा कडकडाट (thunderstorms and lightning) आणि ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे. उद्या ८ तारखेला पावसाची व्याप्ती वाढून तो कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पसरण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त असल्याचं मुंबई वेधशाळेच्या माहितीवरून स्पष्ट होतंय.
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds &light to moderate spells of rain very likely at isolated places in the districts of Dhule, Nasik, Nandurbar, Jalgaon , Pune, Ahmednagar,Aurangabad and Thane during next 3-4 hours. pic.twitter.com/e6n7u2U02H
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 7, 2022
2. रशिया - युक्रेन युद्धामुळे (RussiaUkraineWar) युक्रेनमधून आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलाच्या (sunflower oil) पुरवठ्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पुरवठा वाढवण्यावर सरकारनं भर द्यावा, असा सल्ला सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (sopa) दिलाय. त्याच बरोबर खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्याची मागणीही सोपानं केंद्राशी केलेल्या पत्रव्यवहारातून केलीय. चालू युद्धामुळे देशात दोन लाख टन खाद्यतेलाचा तुटवडा भासेल, असा सोपाचा अंदाज आहे.
हे देखील वाचा : भारत यावर्षी विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात करण्याच्या तयारीत
3. आज लातूर बाजारात लाल तुरीची (pigeon pea) २९८३ क्विंटल आवक झालीय. आवक मालाला कमीत कमी ६०६० रुपये क्विंटलचा भाव मिळाला असून जास्तीत जास्त भाव ६६७५ रुपयांचा भाव मिळालाय. तसंच सर्वसाधारण भाव ६४०० रुपयांचे होते. दुसरीकडे नागपूर बाजारात लाल तुरीची आवक ३४५६ क्विंटलची राहिली. या मालाचे भाव ६००० ते ६५२१ रुपयांच्या घरात होते. तर सर्वसाधारण भाव ६३९१ रुपये होता. गेल्या आठवड्यात तूर किमान आधारभूत किमतीच्या (MSP) आसपास आली होती. राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये तुरीचे सर्वसाधारण भाव ६१०० ते ६३०० रुपयांच्या दरम्यान राहिल्याचं गेल्या आठवड्यात दिसलं. तर काही ठिकाणी मालाला ६७०० रुपये क्विंटलचा दरही मिळाला होता.
हे देखील वाचा : हमीभावाने तूर खेरदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद
4. नोमुरा या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार केंद्र सरकारनं खाद्यतेलाचे पर्यायी स्रोत शोधायला सुरुवात केलीय. खतांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असल्याचं नोमुरानं म्हटलंय. सध्याच्या युद्धस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असल्याचंही नोमुरानं म्हटलंय. संस्थेच्या म्हणण्यानुसार भारताचा रशिया, युक्रेन, आणि बेलारुस यांच्याशी थेट व्यापार कमी असला तरी खाद्यतेल आणि खतांच्या पुरवठ्याच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. या तीन देशांची मिळून सुमारे साडे अकरा टक्क्यांची खाद्यतेल (edible oils) निर्यात आणि ११ टक्के खत निर्यात (fertilizers) एकट्या भारताला होत असते. तर रशिया आणि युक्रेनचा विचार करता भारताला लागणाऱ्या एकूण सूर्यफूल आयातीपैकी ९० टक्के आयात ही याच देशांमधून होत असते. तर दुसरीकडे भारत रशियाकडून १७ टक्के एमओपी आणि ६० टक्के नत्र, स्फुरद, आणि पालाश खतांची आयात करत असतो, अशी माहितीही या अहवालात दिलीय.
हा व्हिडिओ पाहिलात का? :
5. गेल्या आठवड्यात राज्यातल्या प्रमुख बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक वाढल्याचं दिसलं. लातूर, जालना, अकोला, वाशीम, आणि अमरावती जिल्ह्यांमधल्या बाजार समित्या पाहिल्यास तिथं आवकेचं प्रमाण जास्त राहिल्याचं दिसतं. याशिवाय खामगाव, धर्माबाद, अंमळनेर, चोपडा, आणि शहादा बाजारातही टप्प्याटप्प्यानं आवक झाल्याचं दिसतं. तर हंगाम सुरू होताच यातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये भावपातळी दबावात आली आहे. लातूर बाजारात गेल्या आठवडाभरात ७८७६४ क्विंटल हरभरा आवक झाला. या कालावधीत सर्वसाधारण भावपातळी ४६५० ते ४९०० रुपयांच्या दरम्यान राहिली. पुणे, मुंबई, आणि लातूर वगळता राज्यात इतर कुठंही आवक मालाला किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळाल्याचं दिसलं नाही. पुणे, मुंबई, आणि लातूर इथंही अपवादात्मक परिस्थितीत नगण्य प्रमाणातल्या मालाला चांगला भाव मिळालाय. यंदा हरभऱ्याला ५२३० रुपयांची किमान आधारभूत किंमत किंवा एमएसपी जाहीर करण्यात आलीय. तर विदर्भातल्या अकोला बाजारात १४३८३ क्विंटल हरभरा विकायला आला होता. या मालाचे सर्वसाधारण दर कमीत कमी ४४०० तर जास्तीत जास्त ४६५० रुपये होते. पोषक हवामान, वाढलेला पेरा, आणि चांगला बियाणे पुरवठा यामुळे यंदा देशात हरभऱ्याचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. २०२१ मध्ये हरभऱ्याचे बाजारभाव हे एमएसपीच्या आसपास किंवा बहुतांश वेळा कमी होते. २०२२ मध्ये संपूर्ण वर्षभरात सध्याच्या पिकाचं आकारमान पाहता, आधारभाव खरेदीतला सरकारी वाटा वाढण्याची गरज असून तसं झालं तरच २०२२ मध्ये एमएसपीच्या आसपास आपण बाजारभावाची अपेक्षा करू शकतो, असं जाणकारांचं मत आहे.
0 comments:
Post a Comment