केंद्र सरकारने साखर कारखान्यांना जुलै महिन्यात साखर विक्रीसाठी अपेक्षेपेक्षा कमी कोटा जाहीर केल्यामुळे वाशी बाजारपेठेत साखरेच्या दरात साडे तीन टक्के वाढ झाली. सरकारने कारखान्यांना जुलै महिन्यासाठी १६ लाख टन साखर विक्रीची परवानगी दिली आहे. वास्तविक हे प्रमाण २० लाख टनापेक्षा अधिक राहील असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. जून महिन्यात २१ लाख टन साखर विकण्यास परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यासाठी कमी कोटा जाहीर झाल्याने पुरवठ्यात घट होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून हजर बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
वाशी बाजारसमितीत एस-३० साखरेच्या दरात प्रति क्विंटल १०० रूपयांची वाढ होऊन ते प्रति क्विंटल ३०२० ते ३०७० रूपयांपर्यंत पोहोचले. गेल्या काही महिन्यांत साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने साखरेच्या संरक्षित साठ्यासाठी (बफर स्टॉक) देशातील पाचशे साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. देशातील विक्रमी साखर उत्पादन आणि स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले दर यामुळे साखर उद्योग संकटात सापडला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत.
या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३० लाख टन साखरेचा संरक्षित साठा करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक कारखाना किती साखर संरक्षित साठा म्हणून ठेवू शकेल, याचा कोटा एका आदेशान्वये ठरवून देण्यात आला आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या साखर व वनस्पतजीन्य तेल संचालनालयाने हा आदेश काढला आहे.
महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी गळीत हंगामात ऊस लागवडीखालील क्षेत्रात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. आजारी कारखान्यांना पुनरुज्जीवित करून आगामी हंगामात जास्तीत जास्त कारखाने गाळप करतील, यावर भर देणार असल्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारने साखर कारखान्यांना जुलै महिन्यात साखर विक्रीसाठी अपेक्षेपेक्षा कमी कोटा जाहीर केल्यामुळे वाशी बाजारपेठेत साखरेच्या दरात साडे तीन टक्के वाढ झाली. सरकारने कारखान्यांना जुलै महिन्यासाठी १६ लाख टन साखर विक्रीची परवानगी दिली आहे. वास्तविक हे प्रमाण २० लाख टनापेक्षा अधिक राहील असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. जून महिन्यात २१ लाख टन साखर विकण्यास परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यासाठी कमी कोटा जाहीर झाल्याने पुरवठ्यात घट होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून हजर बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
वाशी बाजारसमितीत एस-३० साखरेच्या दरात प्रति क्विंटल १०० रूपयांची वाढ होऊन ते प्रति क्विंटल ३०२० ते ३०७० रूपयांपर्यंत पोहोचले. गेल्या काही महिन्यांत साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने साखरेच्या संरक्षित साठ्यासाठी (बफर स्टॉक) देशातील पाचशे साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. देशातील विक्रमी साखर उत्पादन आणि स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले दर यामुळे साखर उद्योग संकटात सापडला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत.
या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३० लाख टन साखरेचा संरक्षित साठा करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक कारखाना किती साखर संरक्षित साठा म्हणून ठेवू शकेल, याचा कोटा एका आदेशान्वये ठरवून देण्यात आला आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या साखर व वनस्पतजीन्य तेल संचालनालयाने हा आदेश काढला आहे.
महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी गळीत हंगामात ऊस लागवडीखालील क्षेत्रात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. आजारी कारखान्यांना पुनरुज्जीवित करून आगामी हंगामात जास्तीत जास्त कारखाने गाळप करतील, यावर भर देणार असल्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment