Monday, August 6, 2018

केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढली

जळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात केळीचे दर स्थिर आहेत. उत्तरेकडे श्रावण मासानिमित्त केळीची मागणी चांगली आहे. पिलबागांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. रावेर व यावलमध्ये अधिक आवक असून, प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. नवती केळीला ९६५ रुपये तर पिलबाग केळीला ८१५ रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.

पिलबाग केळीच्या दरात मागील चार दिवसांत जवळपास ७५ रुपये क्विंटलमागे वाढ झाली. तर नवती केळीचे दरही टिकून राहिले आहेत. बऱ्हाणपूर येथील बाजारात कमी दर्जाच्या केळीची आवक अधिक झाली. तेथे प्रतिदिन ३०० ट्रक केळीची आवक झाली. यातील कमाल केळीची पाठवणूक नागपूर, छत्तीसगड व राजस्थानात येथे झाली.
तर रावेर व यावल येथून बॉक्‍समध्ये पॅकिंग केलेल्या केळीची पाठवणूक काश्‍मीर, पंजाब व दिल्ली येथे झाली. तसेच ठाणे, कल्याण येथील मागणीही कायम राहीली.

पिलबाग केळी कमी उपलब्ध झाली. रावेर भागात पिलबाग केळी अधिक दर्जेदार राहीली. तिची थेट वातानुकूलित यंत्रणा असलेल्या मालवाहू वाहनातून क्रेटमध्ये भरून पंजाबला पाठवणूक झाली. मुक्ताईनगर, रावेर तालुक्‍यांतील तापीकाठावरील भागातील पिलबाग केळी जवळपास संपली आहे. रावेरच मध्य भागात पिलबाग केळीची कमी अधिक स्वरूपात कापणी झाली. सध्याचे कोरडे व आर्द्रतायुक्त वातावरण केळी पक्व हेण्यास पोषक असल्याने घड लवकर कापणीवर आले.

चोपडा, जळगाव व जामनेर भागात अर्ली कांदेबागांची कापणीही अधिक प्रमाणात सुरू झाली. या भागातून पंजाब व ठाणे येथे क्रेटने केळी पाठविण्यात आली. अर्ली कांदेबागासंबंधी काही शेतकऱ्यांना क्विंटलमागे १५० रुपये ऑनचे दर मिळाले. केळीची आवक मागील महिन्याच्या तुलनेत पुढे कमी राहील, असे मात्र जाणकारांनी सांगितले आहे. कारण रावेर व यावलमध्ये कापणीवरील केळी बागा संपत आल्या आहेत. तर चोपडा, जळगाव व जामनेरात कांदेबाग केळीची कापणी जोमात व्हायला काही दिवस वेळ आहे, असे सांगण्यात आले.

धान्य आवक ठप्प
सध्या व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार बाजार समितीमध्ये धान्यासंबंधी होत आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड, हरदा भागातून गव्हाची जवळपास ५०० क्विंटल आवक मागील आठवड्यात जळगाव बाजार समितीत झाली. मका, दादरची आवक मात्र जवळपास शून्यावर आली आहे. तर सोयाबीन व डाळींचे व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले.

भरताच्या अर्ली लागवडीतून आवक
भरताच्या वांग्यांची अर्ली लागवड केलेल्या भुसावळ, जामनेरातील भागातून आवक सुरू झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. तर काटेरी, काळ्या वांग्यांनाही १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाल्याची माहिती मिळाली.

News Item ID: 
18-news_story-1533563083
Mobile Device Headline: 
केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

जळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात केळीचे दर स्थिर आहेत. उत्तरेकडे श्रावण मासानिमित्त केळीची मागणी चांगली आहे. पिलबागांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. रावेर व यावलमध्ये अधिक आवक असून, प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. नवती केळीला ९६५ रुपये तर पिलबाग केळीला ८१५ रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.

पिलबाग केळीच्या दरात मागील चार दिवसांत जवळपास ७५ रुपये क्विंटलमागे वाढ झाली. तर नवती केळीचे दरही टिकून राहिले आहेत. बऱ्हाणपूर येथील बाजारात कमी दर्जाच्या केळीची आवक अधिक झाली. तेथे प्रतिदिन ३०० ट्रक केळीची आवक झाली. यातील कमाल केळीची पाठवणूक नागपूर, छत्तीसगड व राजस्थानात येथे झाली.
तर रावेर व यावल येथून बॉक्‍समध्ये पॅकिंग केलेल्या केळीची पाठवणूक काश्‍मीर, पंजाब व दिल्ली येथे झाली. तसेच ठाणे, कल्याण येथील मागणीही कायम राहीली.

पिलबाग केळी कमी उपलब्ध झाली. रावेर भागात पिलबाग केळी अधिक दर्जेदार राहीली. तिची थेट वातानुकूलित यंत्रणा असलेल्या मालवाहू वाहनातून क्रेटमध्ये भरून पंजाबला पाठवणूक झाली. मुक्ताईनगर, रावेर तालुक्‍यांतील तापीकाठावरील भागातील पिलबाग केळी जवळपास संपली आहे. रावेरच मध्य भागात पिलबाग केळीची कमी अधिक स्वरूपात कापणी झाली. सध्याचे कोरडे व आर्द्रतायुक्त वातावरण केळी पक्व हेण्यास पोषक असल्याने घड लवकर कापणीवर आले.

चोपडा, जळगाव व जामनेर भागात अर्ली कांदेबागांची कापणीही अधिक प्रमाणात सुरू झाली. या भागातून पंजाब व ठाणे येथे क्रेटने केळी पाठविण्यात आली. अर्ली कांदेबागासंबंधी काही शेतकऱ्यांना क्विंटलमागे १५० रुपये ऑनचे दर मिळाले. केळीची आवक मागील महिन्याच्या तुलनेत पुढे कमी राहील, असे मात्र जाणकारांनी सांगितले आहे. कारण रावेर व यावलमध्ये कापणीवरील केळी बागा संपत आल्या आहेत. तर चोपडा, जळगाव व जामनेरात कांदेबाग केळीची कापणी जोमात व्हायला काही दिवस वेळ आहे, असे सांगण्यात आले.

धान्य आवक ठप्प
सध्या व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार बाजार समितीमध्ये धान्यासंबंधी होत आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड, हरदा भागातून गव्हाची जवळपास ५०० क्विंटल आवक मागील आठवड्यात जळगाव बाजार समितीत झाली. मका, दादरची आवक मात्र जवळपास शून्यावर आली आहे. तर सोयाबीन व डाळींचे व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले.

भरताच्या अर्ली लागवडीतून आवक
भरताच्या वांग्यांची अर्ली लागवड केलेल्या भुसावळ, जामनेरातील भागातून आवक सुरू झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. तर काटेरी, काळ्या वांग्यांनाही १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाल्याची माहिती मिळाली.

English Headline: 
agriculture news in marathi, Banana rate stable; Early Kandebag grew inward
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, केळी, Banana, छत्तीसगड, राजस्थान, काश्‍मीर, पंजाब, कल्याण, मुक्ता, ठाणे, mate, व्यापार, बाजार समिती, agriculture Market Committee, सोयाबीन, डाळ, भुसावळ


0 comments:

Post a Comment