Thursday, August 9, 2018

हिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन अावश्यक

पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांमध्ये ब-याचशा समस्या उद्‌भवतात. दूध उत्पादनात वाढ होते. परंतु, दुधाची प्रत खालावते, हगवण लागते, चरणाऱ्या जनावरांमध्ये जंतप्रादुर्भाव होऊन जनावरे अशक्त होतात, हे होऊ नये म्हणून जनावरांना समतोल अाहार देण्याकडे लक्ष द्यावे.

पशुआहार नियोजन

  • केवळ हिरवा चारा दिल्यामुळे जनावरांची रवंथ करण्याची क्षमता चांगली राहात नाही. हिरव्या चाऱ्यासोबतच जनावरांना वाळलेला चारा देणे पण महत्त्वाचे आहे.
  • पावसाळ्यामध्ये चराऊ कुरणातील हिरव्या चाऱ्यावर जंताचे प्रमाण वाढते. असा चारा जनावरांना जास्त प्रमाणात दिल्यास जंत व जंतांची अंडी जनावरांच्या पोटामध्ये जाऊन तेथे त्यांची संख्या वाढते. त्यामुळे जनावरांना हगवण लागते. जनावरे अशक्त होतात. जनावरांपासून मिळणारे उत्पन्न घटते.
  • दूध उत्पादन घटते. औषधाेपचारावरील खर्च वाढतो, जनावरे आजारी पडतात. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अतिजंत प्रादुर्भावामुळे वासरे/ करडे दगावण्याची शक्‍यता असते. म्हणून पावसाळ्यात विशेषतः चरणाऱ्या जनावरांमध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंत निर्मूलन करावे.
  • पावसाळ्यामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात झाल्यास असा चारा एकत्र करून वाळवून ठेवावा. जेणेकरून चारा कमतरते वेळी हा चारा उपयोगी पडेल.
  • पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याच्या अतिवापरामुळे दूध उत्पादन वाढते. परंतु, दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण घटते. त्यामुळे दुधाला योग्य भाव मिळत नाही.
  • त्याकरिता पावसाळ्यात जरी मुबलक हिरवा चारा उपलब्ध असला, तरी हिरव्या चाऱ्यासोबत दररोज वाळलेल्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात समावेश करावा.
  • अतिकोवळा चारा न देता उत्तम अवस्थेतील पौष्टिक चाऱ्याचाच जनावरांच्या आहारात वापर करावा.
  • हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा दिल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण वाढते. जनावरांतील रवंथप्रक्रिया सुधारते व शेण घट्ट येण्यास मदत होते.
  • अतिकोवळ्या चाऱ्यामुळे शेळ्यांमध्ये विशेषतः करडामध्ये अंत्रविषार या रोगाचे प्रमाण वाढते. म्हणून पिलांना केवळ कोवळा चारा देऊ नये. पावसाळ्यापूर्वी सर्व जनावरांना संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
  • पावसाळ्यामध्ये पौ.िष्टक चारा पिकांची लागवड करणे हे किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर ठरते. कारण पावसाळ्यात पाणी उपलब्ध असल्यामुळे चारापिकांचे उत्पादन घेऊन जनावरांसाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याची सोय करता येतो. यामध्ये विशेषतः डी.एच.एन.-६, बी.एन.एच.-१०, दशरथ, शेवरी या चारापिकांची वैरणीसाठी लागवड करावी.
  • अतिरिक्त हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मुरघास बनवून साठवून ठेवल्यास त्याचा उन्हाळ्यामधील चारा टंचाई टाळण्यासाठी वापर करता येतो, यामुळे दूध उत्पादन टिकून राहण्यास मदत होते.

फायदे

  • जनावरे आजारास कमी प्रमाणात बळी पडतात.
  • जनावरांची प्रतिकारक क्षमता वाढते.
  • दूध उत्पादन वाढते.
  • जनावरांची शारीरिक वाढ योग्य होते.
  • वासरे लवकर माजावर येतात.
  • औषध उपचारावरील खर्च कमी होतो.

संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

News Item ID: 
18-news_story-1533817414
Mobile Device Headline: 
हिरव्या, कोरड्या चाऱ्याचे योग्य नियोजन अावश्यक
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

पावसाळ्यामध्ये सर्वत्र भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांमध्ये ब-याचशा समस्या उद्‌भवतात. दूध उत्पादनात वाढ होते. परंतु, दुधाची प्रत खालावते, हगवण लागते, चरणाऱ्या जनावरांमध्ये जंतप्रादुर्भाव होऊन जनावरे अशक्त होतात, हे होऊ नये म्हणून जनावरांना समतोल अाहार देण्याकडे लक्ष द्यावे.

पशुआहार नियोजन

  • केवळ हिरवा चारा दिल्यामुळे जनावरांची रवंथ करण्याची क्षमता चांगली राहात नाही. हिरव्या चाऱ्यासोबतच जनावरांना वाळलेला चारा देणे पण महत्त्वाचे आहे.
  • पावसाळ्यामध्ये चराऊ कुरणातील हिरव्या चाऱ्यावर जंताचे प्रमाण वाढते. असा चारा जनावरांना जास्त प्रमाणात दिल्यास जंत व जंतांची अंडी जनावरांच्या पोटामध्ये जाऊन तेथे त्यांची संख्या वाढते. त्यामुळे जनावरांना हगवण लागते. जनावरे अशक्त होतात. जनावरांपासून मिळणारे उत्पन्न घटते.
  • दूध उत्पादन घटते. औषधाेपचारावरील खर्च वाढतो, जनावरे आजारी पडतात. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अतिजंत प्रादुर्भावामुळे वासरे/ करडे दगावण्याची शक्‍यता असते. म्हणून पावसाळ्यात विशेषतः चरणाऱ्या जनावरांमध्ये पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंत निर्मूलन करावे.
  • पावसाळ्यामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात झाल्यास असा चारा एकत्र करून वाळवून ठेवावा. जेणेकरून चारा कमतरते वेळी हा चारा उपयोगी पडेल.
  • पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याच्या अतिवापरामुळे दूध उत्पादन वाढते. परंतु, दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण घटते. त्यामुळे दुधाला योग्य भाव मिळत नाही.
  • त्याकरिता पावसाळ्यात जरी मुबलक हिरवा चारा उपलब्ध असला, तरी हिरव्या चाऱ्यासोबत दररोज वाळलेल्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात समावेश करावा.
  • अतिकोवळा चारा न देता उत्तम अवस्थेतील पौष्टिक चाऱ्याचाच जनावरांच्या आहारात वापर करावा.
  • हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा दिल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण वाढते. जनावरांतील रवंथप्रक्रिया सुधारते व शेण घट्ट येण्यास मदत होते.
  • अतिकोवळ्या चाऱ्यामुळे शेळ्यांमध्ये विशेषतः करडामध्ये अंत्रविषार या रोगाचे प्रमाण वाढते. म्हणून पिलांना केवळ कोवळा चारा देऊ नये. पावसाळ्यापूर्वी सर्व जनावरांना संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
  • पावसाळ्यामध्ये पौ.िष्टक चारा पिकांची लागवड करणे हे किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर ठरते. कारण पावसाळ्यात पाणी उपलब्ध असल्यामुळे चारापिकांचे उत्पादन घेऊन जनावरांसाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याची सोय करता येतो. यामध्ये विशेषतः डी.एच.एन.-६, बी.एन.एच.-१०, दशरथ, शेवरी या चारापिकांची वैरणीसाठी लागवड करावी.
  • अतिरिक्त हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मुरघास बनवून साठवून ठेवल्यास त्याचा उन्हाळ्यामधील चारा टंचाई टाळण्यासाठी वापर करता येतो, यामुळे दूध उत्पादन टिकून राहण्यास मदत होते.

फायदे

  • जनावरे आजारास कमी प्रमाणात बळी पडतात.
  • जनावरांची प्रतिकारक क्षमता वाढते.
  • दूध उत्पादन वाढते.
  • जनावरांची शारीरिक वाढ योग्य होते.
  • वासरे लवकर माजावर येतात.
  • औषध उपचारावरील खर्च कमी होतो.

संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

English Headline: 
agriculture story in marathi, fodder management of livestock
Author Type: 
External Author
डॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील


0 comments:

Post a Comment