१) वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालश या खतमात्रेपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी दिलेले आहे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.
२) पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९ः१९ः१९ या विद्राव्य खताची दोन टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.
३) दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन ः
१) पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते.
पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन ः
१. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ः पेरणीनंतर १८ ते २१ दिवस.
२. कांडी धरण्याची अवस्था ः पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस.
३. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था ः पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस.
४. दाणे भरण्याची अवस्था ः पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस.
काही ठरावीक वेळेलाच पाणी देणे शक्य असल्यास नियोजन ः
१. एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
२. पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
३) गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.
डॉ. संजय पाटील ः ७५८८०३६४४८
डॉ. अविनाश गोसावी ः ७५८८००५९०५
( कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)
१) वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालश या खतमात्रेपैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी दिलेले आहे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.
२) पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९ः१९ः१९ या विद्राव्य खताची दोन टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी.
३) दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया) फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन ः
१) पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते.
पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन ः
१. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ः पेरणीनंतर १८ ते २१ दिवस.
२. कांडी धरण्याची अवस्था ः पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस.
३. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था ः पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस.
४. दाणे भरण्याची अवस्था ः पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस.
काही ठरावीक वेळेलाच पाणी देणे शक्य असल्यास नियोजन ः
१. एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
२. पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
३) गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.
डॉ. संजय पाटील ः ७५८८०३६४४८
डॉ. अविनाश गोसावी ः ७५८८००५९०५
( कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)




0 comments:
Post a Comment