जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने दर स्थिर आहेत. जिल्ह्यात पाचोरा व जळगाव येथील बाजारात आवक अधिक आहे. दर प्रतिक्विंटल १८ ते ३८ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याची माहिती मिळाली.
यावल, रावेरातील आठवडे बाजारांमध्ये भेंडीला दर बऱ्यापैकी मिळत आहेत. या भागातील शेतकरी निंभोरा, तांदलवाडी, सावदा (ता. रावेर), बामणोद, भालोद, फैजपूर, न्हावी (ता. यावल), भुसावळ येथील आठवडे बाजारांमध्ये भेंडीची हातविक्री करीत आहेत. त्यात शेतकऱ्यांना कमाल ५० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर सावदा, फैजपूर, बामणोद येथील बाजारात मिळत आहेत.
भेंडीचे क्षेत्र धरणगाव, एरंडोल, पाचोरा भागांत कमी आहे. तरीही यावल, जळगाव, मुक्ताईनगर, चोपडा व जामनेर भागांत लागवड बऱ्यापैकी झाली आहे. जळगाव बाजार समितीमध्ये या आठवड्यात प्रतिदिन सहा क्विंटल आवक झाली. दर कमाल ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळाला. किमान दर १८ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत.
भेंडीची आवक पुढे वाढू शकते. कारण उशिरा लागवडीच्या भेंडीतून काढणी हवी तशी सुरू नाही. अनेक भागांत पीक जोमात आहे. पण जळगाव तालुक्यातील गिरणा काठच्या गावांमध्ये पीक पिवळे पडले आहे. त्यातून काढणीयोग्य भेंडी फारशी येत नसल्याची स्थिती आहे.
काढणीसाठी शेतकऱ्यांना मजूर कमी मिळत आहेत. रोज कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काढणी करून घ्यावी लागत आहे. एक एकर क्षेत्रात रोज काढणी करावी लागत असून, दोन महिन्याच्या पिकात २० ते ३० किलो भेंडी निघत आहे.
जळगाव : भेंडीची आवक वाढत आहे. उठाव कायम असल्याने दर स्थिर आहेत. जिल्ह्यात पाचोरा व जळगाव येथील बाजारात आवक अधिक आहे. दर प्रतिक्विंटल १८ ते ३८ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याची माहिती मिळाली.
यावल, रावेरातील आठवडे बाजारांमध्ये भेंडीला दर बऱ्यापैकी मिळत आहेत. या भागातील शेतकरी निंभोरा, तांदलवाडी, सावदा (ता. रावेर), बामणोद, भालोद, फैजपूर, न्हावी (ता. यावल), भुसावळ येथील आठवडे बाजारांमध्ये भेंडीची हातविक्री करीत आहेत. त्यात शेतकऱ्यांना कमाल ५० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर सावदा, फैजपूर, बामणोद येथील बाजारात मिळत आहेत.
भेंडीचे क्षेत्र धरणगाव, एरंडोल, पाचोरा भागांत कमी आहे. तरीही यावल, जळगाव, मुक्ताईनगर, चोपडा व जामनेर भागांत लागवड बऱ्यापैकी झाली आहे. जळगाव बाजार समितीमध्ये या आठवड्यात प्रतिदिन सहा क्विंटल आवक झाली. दर कमाल ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळाला. किमान दर १८ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत.
भेंडीची आवक पुढे वाढू शकते. कारण उशिरा लागवडीच्या भेंडीतून काढणी हवी तशी सुरू नाही. अनेक भागांत पीक जोमात आहे. पण जळगाव तालुक्यातील गिरणा काठच्या गावांमध्ये पीक पिवळे पडले आहे. त्यातून काढणीयोग्य भेंडी फारशी येत नसल्याची स्थिती आहे.
काढणीसाठी शेतकऱ्यांना मजूर कमी मिळत आहेत. रोज कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काढणी करून घ्यावी लागत आहे. एक एकर क्षेत्रात रोज काढणी करावी लागत असून, दोन महिन्याच्या पिकात २० ते ३० किलो भेंडी निघत आहे.
0 comments:
Post a Comment