यावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा हंगाम लांबल्यामुळे आंबा, काजूमध्ये मोहोर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात आंबा, काजू पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
आंबा
तुडतुडे लक्षणे
मोहरातील तसेच कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर गळून जातो.
शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे तसेच फळे काळी पडतात.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)
प्रादुर्भाव कमी असल्यास ः
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि किंवा
इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिलि किंवा
प्रादुर्भाव जास्त असल्यास ः
क्लोथीयानिडीन (५० टक्के पाण्यात मिसळणारे) १.२ ग्रॅम किंवा
थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम
करपा लक्षणे
प्रादुर्भाव नवीन पानांवर जास्त होतो. पानावर अनियमित वेडेवाकडे फिकट किंवा गडद विटकरी रंगाचे ठिपके पडतात.
मोहरामध्ये फुलांच्या देठावर व उमललेल्या फुलांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. परिणामी मोहर गळून जातो.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)
कॅप्टन २ ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझीम १ ग्रॅम
झाडे दाट असल्यास फांद्याच्या विरळणी करावी.
काजू
ढेकण्या लक्षणे
झाडांवर नवीन पालवी आल्यापासून ते फलधारणेपर्यंत प्रादुर्भाव होतो.
मोहर, नवीन पालवीतील रस शोषून घेतल्यामुळे मोहर सुकतो, फळगळ होते.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)
लॅंबडा साहॅलोथीन (५ टक्के) १ मिलि किंवा
प्रोफेनोफॉस (४० टक्के) १ मिलि.
करपलेले शेंडे काढून नष्ट करावेत.
नारळ
नारळाला पाणी देण्यास सुरवात झाल्यानंतर, खताची दुसरी मात्रा (७५० ग्रॅम युरिया आणि ७०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) आळ्यांमध्ये द्यावी.
बुरशीमुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
ः योगेश परूळेकर, ८२७५४५७६७८
(उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय,
दापोली, जि. रत्नागिरी).
(पीक सल्ल्यामध्ये शिफारसीत बुरशीनाशक आणि कीडनाशकांच्या चाचण्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या आहेत, यांना लेबल क्लेम नाही)
यावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा हंगाम लांबल्यामुळे आंबा, काजूमध्ये मोहोर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात आंबा, काजू पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
आंबा
तुडतुडे लक्षणे
मोहरातील तसेच कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर गळून जातो.
शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे तसेच फळे काळी पडतात.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)
प्रादुर्भाव कमी असल्यास ः
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि किंवा
इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिलि किंवा
प्रादुर्भाव जास्त असल्यास ः
क्लोथीयानिडीन (५० टक्के पाण्यात मिसळणारे) १.२ ग्रॅम किंवा
थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम
करपा लक्षणे
प्रादुर्भाव नवीन पानांवर जास्त होतो. पानावर अनियमित वेडेवाकडे फिकट किंवा गडद विटकरी रंगाचे ठिपके पडतात.
मोहरामध्ये फुलांच्या देठावर व उमललेल्या फुलांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. परिणामी मोहर गळून जातो.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)
कॅप्टन २ ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझीम १ ग्रॅम
झाडे दाट असल्यास फांद्याच्या विरळणी करावी.
काजू
ढेकण्या लक्षणे
झाडांवर नवीन पालवी आल्यापासून ते फलधारणेपर्यंत प्रादुर्भाव होतो.
मोहर, नवीन पालवीतील रस शोषून घेतल्यामुळे मोहर सुकतो, फळगळ होते.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी)
लॅंबडा साहॅलोथीन (५ टक्के) १ मिलि किंवा
प्रोफेनोफॉस (४० टक्के) १ मिलि.
करपलेले शेंडे काढून नष्ट करावेत.
नारळ
नारळाला पाणी देण्यास सुरवात झाल्यानंतर, खताची दुसरी मात्रा (७५० ग्रॅम युरिया आणि ७०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) आळ्यांमध्ये द्यावी.
बुरशीमुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
ः योगेश परूळेकर, ८२७५४५७६७८
(उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय,
दापोली, जि. रत्नागिरी).
(पीक सल्ल्यामध्ये शिफारसीत बुरशीनाशक आणि कीडनाशकांच्या चाचण्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या आहेत, यांना लेबल क्लेम नाही)




0 comments:
Post a Comment