नागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या संत्राफळांची देशांतर्गंत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यामुळे संत्रादरात सुधारणा झाली आहे. कळमणा बाजार समितीत संत्रादर ६०० ते २२०० रुपये क्विंटलवर पोचले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे दर ६०० ते १५०० रुपये क्विंटल इतके होते.
संत्र्यांची रोजची सरासरी आवक साडेसहा हजार क्विंटलची असल्याचे सांगण्यात आले. डोमॅस्टिकस्तरावर संत्रा फळांना अचानक मागणी वाढली आहे. मुख्य निर्यातदार असलेल्या बांग्लादेशचाही त्यामध्ये समावेश आहे. मागणी वाढल्याच्या परिणामी बांग्लादेशमध्ये, देशातंर्गंत बाजारपेठेतही दरात तेजी आली आहे. १५०० टका (बांग्लादेशी चलन) असलेल्या संत्र्याचे दर २००० टकावर पोचले आहेत.
देशाअंतर्गंत बाजारात ६०० ते २२०० रुपये क्विंटलचे दर संत्र्याला मिळत आहे. बाजारात हरभरा आवक ९२३ क्विंटलची आहे. हरभऱ्याचे दर गेल्या आठवड्यात ३४०० ते ३८५१ रुपये होते. या आठड्यात हरभऱ्याचे व्यवहार ३४०० ते ३७२४ रुपयांनी झाले. हरभरा दरात काही अंशी असे चढउतार अनुभवले जात आहेत.
तुरीची आवक २९४८ क्विंटलची होती. या आठवड्यात तुरीची आवक ३६११ क्विंटलवर पोचली. तुरीचे दर ४४०० ते ५००२ रुपये होते. या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५०८८ रुपयांवर पोचले आहेत. सोयाबीनचे व्यवहार गेल्या आठवड्यात ३३०० ते ३६१० रुपये क्विंटलने झाले. तर, आवक १५६ क्विंटलची होती. या आठवड्यात आवक २४९ क्विंटलची आणि दर ३२५० ते ३७०० रुपयांवर पोचले. बाजारात मोसंबीची आवक १००० क्विंटलची आहे. मोसंबीचे दर १५०० ते १७०० रुपये आहेत. मोठ्या आकाराच्या फळांना हेच दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
केळीचे दर ४५० ते ५५० रुपये
बाजारात केळीचे दर ४५० ते ५५० रुपयांवर स्थिर आहेत. गेल्या महिनाभरापासून हीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष आवक २५० क्विंटल, तर दर ५००० ते ६००० रुपयांवर स्थिर आहेत. डाळिंब दर १५०० ते ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. डाळिंबांची आवक ६७९ क्विंटलची आहे. बाजारातील बटाटा आवक ४६८९ क्विंटलची आहे.
बटाटा मध्य प्रदेशातल छिंदवाडा भागातून बाजारात पोचत आहे. बटाट्याला सरासरी १५०० ते १७०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. लाल कांदा आवक २००० क्विंटलची असून दर १५०० ते २२०० रुपये होता. लसूण दर २५०० ते ५००० रुपये क्विंटल आणि आवक ३१८६ क्विंटलची होती.
नागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या संत्राफळांची देशांतर्गंत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यामुळे संत्रादरात सुधारणा झाली आहे. कळमणा बाजार समितीत संत्रादर ६०० ते २२०० रुपये क्विंटलवर पोचले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे दर ६०० ते १५०० रुपये क्विंटल इतके होते.
संत्र्यांची रोजची सरासरी आवक साडेसहा हजार क्विंटलची असल्याचे सांगण्यात आले. डोमॅस्टिकस्तरावर संत्रा फळांना अचानक मागणी वाढली आहे. मुख्य निर्यातदार असलेल्या बांग्लादेशचाही त्यामध्ये समावेश आहे. मागणी वाढल्याच्या परिणामी बांग्लादेशमध्ये, देशातंर्गंत बाजारपेठेतही दरात तेजी आली आहे. १५०० टका (बांग्लादेशी चलन) असलेल्या संत्र्याचे दर २००० टकावर पोचले आहेत.
देशाअंतर्गंत बाजारात ६०० ते २२०० रुपये क्विंटलचे दर संत्र्याला मिळत आहे. बाजारात हरभरा आवक ९२३ क्विंटलची आहे. हरभऱ्याचे दर गेल्या आठवड्यात ३४०० ते ३८५१ रुपये होते. या आठड्यात हरभऱ्याचे व्यवहार ३४०० ते ३७२४ रुपयांनी झाले. हरभरा दरात काही अंशी असे चढउतार अनुभवले जात आहेत.
तुरीची आवक २९४८ क्विंटलची होती. या आठवड्यात तुरीची आवक ३६११ क्विंटलवर पोचली. तुरीचे दर ४४०० ते ५००२ रुपये होते. या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५०८८ रुपयांवर पोचले आहेत. सोयाबीनचे व्यवहार गेल्या आठवड्यात ३३०० ते ३६१० रुपये क्विंटलने झाले. तर, आवक १५६ क्विंटलची होती. या आठवड्यात आवक २४९ क्विंटलची आणि दर ३२५० ते ३७०० रुपयांवर पोचले. बाजारात मोसंबीची आवक १००० क्विंटलची आहे. मोसंबीचे दर १५०० ते १७०० रुपये आहेत. मोठ्या आकाराच्या फळांना हेच दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
केळीचे दर ४५० ते ५५० रुपये
बाजारात केळीचे दर ४५० ते ५५० रुपयांवर स्थिर आहेत. गेल्या महिनाभरापासून हीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष आवक २५० क्विंटल, तर दर ५००० ते ६००० रुपयांवर स्थिर आहेत. डाळिंब दर १५०० ते ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. डाळिंबांची आवक ६७९ क्विंटलची आहे. बाजारातील बटाटा आवक ४६८९ क्विंटलची आहे.
बटाटा मध्य प्रदेशातल छिंदवाडा भागातून बाजारात पोचत आहे. बटाट्याला सरासरी १५०० ते १७०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. लाल कांदा आवक २००० क्विंटलची असून दर १५०० ते २२०० रुपये होता. लसूण दर २५०० ते ५००० रुपये क्विंटल आणि आवक ३१८६ क्विंटलची होती.
0 comments:
Post a Comment