Monday, March 23, 2020

कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम

कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात भाजीपाला बाजारावर परिणाम झाला. अपवादवगळता बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर राहू शकले नाहीत. ओली मिरची, घेवडा, ओला वटाणा आदी भाजीपाल्याचे दर इतर भाजीपाल्याच्या तुलनेत समाधानकारक स्थितीत होते. ओली मिरचीस दहा किलोस किमान १०० ते कमाल २५०, घेवड्यास दहा किलोस २०० ते २५०, ओला वाटाण्यास दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर मिळाला. स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री होणारा बराचसा भाजीपाला येथील बाजार समितीत आला. यामुळे नियमित भाजीपाल्यापेक्षा येथे भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होती. 

जितक्‍या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होती. तितकी मागणी नसल्याने दरात वाढ होवू शकली नाही. गवारीची तीनशे ते चारशे पाट्या आवक राहिली. गवारीस दहा किलोस किमान १०० ते कमाल ३०० रुपये दर होता. भेंडीची चारशे ते पाचशे पाट्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते १८० रुपये दर मिळाला. दोडक्‍यास दहा किलोस ५० ते १५० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची पस्तीस ते चाळीस हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ६०० रुपये दर होता. 

ऐन लग्नसराईच्या काळातही कोथिंबिरीची तेजी टिकू शकली नाही. कोरोनामुळे लग्नसमारंभ, मोठे महोत्सव रद्द झाल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम कोथिंबिरीच्या मागणीवर झाला. यामुळे मागणीत मोठी घट झाल्याचे भाजीपाला विभागातील सूत्रांनी सांगितले. 

लिंबांची दीड हजार पोत्यांची आवक

पालक, पोकळा, शेपूस शेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाला. फळांमध्ये लिंबूची एक ते दीड हजार पोत्यांची आवक झाली. प्रती पोत्यास किमान १०० ते कमाल ४०० रुपये दर होता. द्राक्षाची सहाशे ते सातशे बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १० ते ३० रुपये दर होता. डाळिंबास किलोस २० ते ८० रुपये दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1584967085-351
Mobile Device Headline: 
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात भाजीपाला बाजारावर परिणाम झाला. अपवादवगळता बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर राहू शकले नाहीत. ओली मिरची, घेवडा, ओला वटाणा आदी भाजीपाल्याचे दर इतर भाजीपाल्याच्या तुलनेत समाधानकारक स्थितीत होते. ओली मिरचीस दहा किलोस किमान १०० ते कमाल २५०, घेवड्यास दहा किलोस २०० ते २५०, ओला वाटाण्यास दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर मिळाला. स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री होणारा बराचसा भाजीपाला येथील बाजार समितीत आला. यामुळे नियमित भाजीपाल्यापेक्षा येथे भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होती. 

जितक्‍या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होती. तितकी मागणी नसल्याने दरात वाढ होवू शकली नाही. गवारीची तीनशे ते चारशे पाट्या आवक राहिली. गवारीस दहा किलोस किमान १०० ते कमाल ३०० रुपये दर होता. भेंडीची चारशे ते पाचशे पाट्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते १८० रुपये दर मिळाला. दोडक्‍यास दहा किलोस ५० ते १५० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची पस्तीस ते चाळीस हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ६०० रुपये दर होता. 

ऐन लग्नसराईच्या काळातही कोथिंबिरीची तेजी टिकू शकली नाही. कोरोनामुळे लग्नसमारंभ, मोठे महोत्सव रद्द झाल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम कोथिंबिरीच्या मागणीवर झाला. यामुळे मागणीत मोठी घट झाल्याचे भाजीपाला विभागातील सूत्रांनी सांगितले. 

लिंबांची दीड हजार पोत्यांची आवक

पालक, पोकळा, शेपूस शेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाला. फळांमध्ये लिंबूची एक ते दीड हजार पोत्यांची आवक झाली. प्रती पोत्यास किमान १०० ते कमाल ४०० रुपये दर होता. द्राक्षाची सहाशे ते सातशे बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १० ते ३० रुपये दर होता. डाळिंबास किलोस २० ते ८० रुपये दर मिळाला.

English Headline: 
Agriculture news in marathi Impact of 'Corona' on vegetable prices in Kolhapur
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोल्हापूर, कोरोना, Corona, भाजीपाला बाजार, Vegetable Market, मिरची, बाजार समिती, agriculture Market Committee, भेंडी, Okra, कोथिंबिर, द्राक्ष, डाळिंब
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Impact, 'Corona', vegetable, prices, Kolhapur
Meta Description: 
Impact of 'Corona' on vegetable prices in Kolhapur कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात भाजीपाला बाजारावर परिणाम झाला. अपवादवगळता बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर राहू शकले नाहीत.


0 comments:

Post a Comment